Mumbai Indians Fact Check News : जर कर्णधार बनवायचं नसेल तर रिलीज करा…; सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सला दिला अल्टिमेटम, नेमकं चाललंय तरी काय?


Suryakumar yadav to Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामात म्हणजेच आयपीएल 2027 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ एका नव्या कर्णधारासह मैदानात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले होते, परंतु हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. आता आयपीएल 2026 संपल्यानंतर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सपासून वेगळा होणार असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हार्दिक पांड्या ट्रेड डीलद्वारे मुंबई सोडून दुसऱ्या एखाद्या संघात सामील होऊ शकतो. या सर्व नाट्यमय घडामोडींदरम्यान, आता सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे एक खळबळजनक वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल दावा काय आहे?

सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवबाबत असा दावा केला जात आहे की, त्याने मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. व्हायरल पोस्टनुसार, सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर मुंबई इंडियन्स मला आगामी हंगामासाठी कर्णधार बनवणार नसेल, तर मला संघातून रिलीज करा.”

या व्हायरल पोस्टमध्ये पुढे असाही दावा करण्यात आला आहे की, आकाश अंबानी यांनी सूर्यकुमारचा हा प्रस्ताव मान्य केला असून सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार बनणार आहे. इतकेच नव्हे तर, सूर्यकुमारने मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया पेजला पुन्हा फॉलो करण्यास सुरुवात केली आहे, असेही यात म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत असली, तरी सूर्याने हे वक्तव्य कधी आणि कुठे केले, याच्या कोणत्याही अधिकृत सुत्राचा उल्लेख या पोस्ट्समध्ये करण्यात आलेला नाही.

काय आहे या व्हायरल बातमीमागचे खरे सत्य?

क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवने असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच मुंबई इंडियन्सने अद्याप सूर्यकुमार यादवला आपला नवा कर्णधार म्हणून घोषित केलेले नाही. सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवच्या नावाने व्हायरल होत असलेली ही पोस्ट पूर्णपणे फेक आहे.

वास्तविक पाहता, आयपीएल 2026 चा हंगाम संपल्यानंतर सोशल मीडियावर केवळ व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही युजर्सकडून अशा प्रकारच्या मनघडंत आणि खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावरील अशा कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर अजिबात विश्वास ठेवू नये. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल किंवा फ्रँचायझीकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत अशा अफवांपासून सावध राहा.

हे ही वाचा –

Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपचा अल्टिमेट क्लायमॅक्स! दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला धोपटले, इकडे भारताच्या काळजाचा ठोका चुकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅचआधी नेमकं काय घडलं?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *