इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपासून चाहते त्याच्या खेळण्याची वाट पाहत होते आणि अखेरीस इंग्लंडमध्ये त्यांची प्रतीक्षा संपली. मात्र, भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला इंग्लंडकडून 4 गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता, तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी, संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी वैभवच्या पदार्पणाच्या सामन्याबद्दल आणि भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी काही महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, माझे लक्ष केवळ तात्काळ सामने जिंकण्यावर नसून, भविष्यासाठी एक मजबूत संघ तयार करण्यावर आहे. वैभव सूर्यवंशी नेहमीच टीम इंडियाच्या नियोजनाचा एक भाग होता. या १५ वर्षीय सलामीवीराला त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी कोणत्याही विशेष तयारीची गरज नव्हती, कारण संघाला त्याच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास होता. वयाच्या 15 वर्षे आणि 99 दिवसांनी पदार्पण करून, सूर्यवंशी भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. आपल्या निर्भीड खेळण्याच्या शैलीमुळे तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला. सूर्यवंशीची निवड झाल्याच्या क्षणापासूनच त्याचा सहभाग निश्चित होता.”
यावेळी, फलंदाजी प्रशिक्षकाने टीम इंडियाचा नवीन कर्णधार, श्रेयस अय्यरबद्दलही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या स्थित्यंतराच्या काळातून जात आहे आणि संघात दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची उणीवही जाणवत आहे. असे असूनही, दोन वर्षांनी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात आपल्या विजेतेपदाचे रक्षण करू शकेल असा एक मजबूत संघ तयार करणे, हे संघाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याचा भारतीय संघाला आता हार्दिक पंड्याची गरज भासत आहे. संघात इतके तगडे खेळाडू असूनही या मॅचविनरची कमतरता संघाला भासत आहे. हार्दिक पंड्या सध्या बेंगळुरुमध्ये सेन्टर ऑफ एक्सिलेंसमध्ये फिटनेसवर काम करत आहे कारण त्याला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती.