मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
ठाणे : रस्त्यावरील खड्डे असो किंवा कधी एखादा पुल पडून होणारी दुर्घटना असो, जिवंतपणी नागरिकांच्यासुरक्षिततेची हमी नाही. मात्र, आता मृत्यूनंतरही मरणयातना भोगाव्या लागत असल्याची, संतप्त भावना व्यक्त करण्याची वेळ मीरा-भाईंदरकरांवर (Mira bhaindar) आली आहे. मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच मृतदेह ठेवण्यात आलेल्या लोखंडी चिता स्टँडवर वरुन धूर निघणाऱ्या चिमणीचा काही भाग अचानक कोसळल्याची…