Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित ‘ही’ 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय…


Garud Puran : हिंदू धर्मशास्त्रात पुनर्जन्माविषयी फार सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे. विज्ञानात मात्र अजूनही या विषयावर संशोधन सुरु आहे. मात्र, अजून काही ठोस निष्कर्ष लागला नाही. इतकं असूनही जगात असेही काही लोक आहे ज्यांचा पुनर्जन्मावर दृढ विश्वास आहे. 

अनेकदा आपल्यावर किंवा इतरांवर एखादं संकट आलं की, कोणत्या जन्माची शिक्षा देव देतोय कोणास ठाऊक? असे उद्गार आपसूक आपल्या तोंडातून निघतात. त्यामुळे खरंच पुनर्जन्म असतो का? आणि त्याचा आपल्या वर्तमानकाळावर परिणाम पडतो का? असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. गरुड पुराणात याच प्रश्नांची उत्तरं काही खास संकेतांच्या माधम्यातून सांगण्यात आली आहेत. 

गरुड पुराणात पुनर्जन्माची ‘ही’ 5 लक्षणं सांगण्यात आली आहेत…

1. एकच स्वप्न वारंवार येणं 

जर तुम्हाला एकच स्वप्न वारंवार येत असेल आणि त्यात दिसणारे लोक आणि ती जागा जर तुमच्या परिचयाची असेल. पण तुमच्या लक्षात नाही की तुम्ही त्यांना नेमकं कुठे पाहिलं आहे तर कदाचित हा तुमचा पुनर्जन्माशी संबंधित संकेत असू शकतो.  

2. पहिल्याच भेटीत अनोळखी व्यक्तीबरोबर कनेक्शन होणं 

कधीकधी आपण अशा व्यक्तीशी भेटतो ज्यांना आपण याआधी कधीच भेटलो नाही आहोत. पण त्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की वर्षानुवर्ष आपण एकमेकांना ओळखतोयत. हा जो संबंध आहे तो तुमच्या मागच्या जन्माशी संबंधित असू शकतो. 

3. भास होणं 

काही लोकांना भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा किंवा घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. अनेकदा यांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्याही ठरतात. अशा वेळी असं धार्मिक मान्यतेनुसार, असं सांगण्यात आलं आहे की तुमची आत्मा तुम्हाला घडणाऱ्या घटनांविषयी आधीच संकेत देते. 

4. एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूप्रति खास आकर्षण 

अनेकदा आपल्याला काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीबद्दल, जागेबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल एक वेगळंच आकर्षण वाटू लागतं. अशा वेळी याचा तुमच्या पुनर्जन्माशी संबंध असू शकतो. 

5. भीती किंवा उदास वाटणं 

काही लोकांना अनेकदा काही कराण नसताना उगास उदास वाटतं किंवा भीती वाटते. अनेकदा वर्तमानाशी संबंधित नसलेल्या गोष्टींचा देखील आपण प्रत्यक्ष वर्तमानात त्याचा वापर वारंवार करतो. 

टीप : गरुड पुराणात सांगण्यात आलेल्या या गोष्टींचा विज्ञानाशी काहीच संबंध नाही. विज्ञानात या गोष्टींवर ठोस पुरावा नाही. मात्र, अशीही मान्यता आहे की आपली आत्मा ही अमर असते. ती एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :      

Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी ‘या’ 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *