उद्धव ठाकरेंचे खासदार-आमदार फुटल्याने राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे. ठाकरेंचे 6 खासदार आणि 1 आमदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले. 7 लोकप्रतिनिधींनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आणखी काही आमदारांवर शिंदे गटाची नजर असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा झटका बसणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘शरद पवार हे देशातील राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या दालनात आले असतील, तर त्यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. काही लोक विसरलेली आहेत. त्या परंपरेनुसार एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचा सत्कार केला, यामागे कोणताही अर्थ लावू नये’.
शिंदेंच्या दालनात शरद पवारांच्या आमदारांची बैठक झाली. यावर मंत्री सामंत म्हणाले, ‘ही राजकीय संस्कृती आहे. शरद पवारांचे आमदार हे एकनाथ शिंदेना भेटल्याचे माहीत नाही. परंतु शिंदेंच्या दालनात भेटले असतील, तर यात वावगं काय आहे? त्यांची बैठक झाल्याने ते शिवसेनेत आले नाहीत, असं काही नाही. शिंदेंनी सत्कार केल्यानंतर पुन्हा कॅबिनेट बैठकीला निघून गेले. त्यामुळे राजकीय चर्चांमध्ये तथ्य नाही’.
मिसिंग लिंकवरून फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘त्यांनी नावे देखील सांगितली आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कसे राजकारण करतात, हे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी खुलासा देखील केला आहे. 10 वर्षांनंतर हे टीका करणारे असतील की नसतील माहीत नाही. परंतु 10 वर्षांनंतर त्या मिसिंग लिंकवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव कायमस्वरुपी कोरलं जाईल. ते कोणी पुसू शकत नाही. नाना पटोले यांच्या सारख्या चांगल्या माणसांना दूर करून अशी माणसांना प्रदेशाध्यक्ष केले जाते. तेव्हा काँग्रेसचे अध:पतन निश्चित आहे.
उद्धव ठाकरे बैठका घेत आहेत. त्यावर सामंत म्हणाले, त्यांना उशिरा बैठका घेण्याची सवय आहे. त्यांनी काल घेतलेल्या बैठकीला काही आमदार गैरहजर असल्याचे ऐकलं आहे. मी दोन दिवस कोकणात होतो. त्यामुळे कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे माहीत नाही. पण काही आमदार हे संपर्कात असू शकता. शिंदे गटात प्रवेश सुरू राहतील. ज्यांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य आहे, ते शिवसेनेत येतच राहतील’.