या घटनेमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली, मात्र त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. त्यांच्या आयुष्याचा शेवटही अत्यंत धक्कादायक ठरला. 1998 मध्ये त्या कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेल्या असताना मालपा येथे झालेल्या भीषण भूस्खलनात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जणांचा जीव गेला आणि प्रोतिमा बेदी यांचा मृतदेहही सापडला नव्हता.