शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला, त्यानंतर सचिन आहेर यांनी देखील उद्धव ठाकेर यांची साथ सोडली आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर बँक निवडणुकीमध्ये महायुतीसोबत गेले आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठंं विधान केलं आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत नाराजी प्रचंड वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दानवे माझा नेता नाही, मी त्यांचा नेता आहे. दानवेंनी तिकडे जाऊन चूक केली, आमचा कोणताही शिवसैनिक त्यांचं काम करत नाही, असं खैरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
दानवे यांनी महायुतीसोबत जायला नाही पाहिजे होतं. उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत हे प्रकरण गेलं आहे, ते यावर निर्णय घेतील. महाविकास आघाडीच्या बैठक घ्यायच्या, चर्चा करायच्या आणि लगेच उडी मारून तिकडे जायचं, हा स्वार्थ आहे. तरीसुद्धा लोक त्यांना पाडणार आहेत, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. दानवे माझा नेता नाही, मी त्यांचा नेता आहे. दानवेंनी तिकडे जाऊन चूक केली, आमचा कोणताही शिवसैनिक त्यांचं काम करत नाही. बाकीचं कुणीही त्यांचं काम करणार नाही, त्यांना चांगला धडा मिळेल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सहकाराची जरी निवडणूक असली तरी आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आपण आपल्या पद्धतीने निवडणुका कराव्यात. आपण लढायचं बाकी कुणाबरोबर जायचं नाही, मग तुम्ही भाषण करून काय फायदा. हे मला आवडलं नाही, मी ताबडतोब वर कंप्लेंट करून टाकली आहे. आज मी तुमच्या टीव्हीमध्ये पाहिलं अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली, असं करू नये, असं खरै यांनी म्हटलं आहे. दरम्यान खैरे आणि दानवे यांच्यामधील दरी आता आणखी वाढत चालली आहे, त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.