रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 


IND vs ENG News  :  भारत आणि इंग्लंड यांच्यात आज ऐतिहासीक लॉर्ड्सवर तिसरा एकदिवसीय सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव केला आहे. इंग्लडने सुरुवातीला फलंदाजी करताना भारतीय संघासमोर 388 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 7 विकेटच्या मोबदल्यात 360 धावा करता आल्या. या विजयासह इंग्लंडने एकदिवसीय मालिका देखील आपल्या खिशात घातली आहे. 

लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाकडून बेन डकेटने 141 धावांची वादळी खेळी केली. खरी खळबळ जॉस बटलरने निर्माण केली, ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये टी-20 प्रमाणे फलंदाजी करताना 13 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या. 

रोहित शर्माने दमदार शतकी खेळी

दरम्यान, 388 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्माने दमदार शतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने 360 धावापर्यंत मजल मारली. लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाकडून बेन डकेटने 141 धावांची वादळी खेळी केली. खरी खळबळ जॉस बटलरने निर्माण केली, ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये टी-20 प्रमाणे फलंदाजी करताना 13 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या. 

इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली

इंग्लंडने लॉर्ड्सवर तिसरा एकदिवसीय सामना 27 धावांनी जिंकला. यजमान इंग्लंडने बेन डकेटच्या (141धावा) “ऐतिहासिक” खेळीच्या जोरावर 387 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, भारतीय संघ निर्धारित षटकांमध्ये केवळ 360 धावाच करू शकला आणि इतिहास रचण्यात अपयशी ठरला. भारताकडून रोहित शर्माने 138 आणि विराट कोहलीने 74 धावा केल्या, पण त्यांना पराभवाचे अंतर केवळ कमी करता आले. 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, एका क्षणी भारतीय संघ इंग्लंडच्या पुढे होता. आज भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास बदलेल असे वाटत होते, पण इंग्लंडने शेवटच्या षटकांमध्ये सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.

भारताचा एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोच्च धावांचा पाठलाग

भारतीय संघानेही एकदिवसीय सामन्यांमध्ये 350 किंवा 400 धावा केल्या आहेत. पण टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कधी इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला आहे का? एकदिवसीय क्रिकेटमधील भारतीय संघाचा सर्वोच्च धावांचा पाठलाग कोणता आहे. भारतीय संघासाठी चांगली बातमी नाही, कारण त्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये 388 किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वीपणे पाठलाग केलेला नाही. भारताचा एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोच्च धावांचा पाठलाग 360 धावांचा आहे, जो त्यांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता. याशिवाय, इतर दोन प्रसंगी टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 350 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांविरुद्ध 351 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

360  धावा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध
351  धावा – इंग्लंडविरुद्ध
351  धावा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *