Pratap Sarnaik’s Letter to Shinde: मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे ज्यांच्यामुळे पक्ष सोडले, त्यांच्याच मांडीवर बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या नावाखाली सत्ता उपभोगली पण मराठी माणसाला टोपी घातल्याचा आरोप सरनाईकांनी केला.
ठाकरे बंधू एकत्र येताच प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र, किशोरी पेडणेकरांकडून खरपूस समाचार
शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे शनिवारी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या निमित्ताने प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंवर एका पत्राच्या माध्यमातून टीका केली आहे. सरनाईक यांनी हे तीन पानी पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
Maharashtra Politics : एकत्र आले, पण एकत्र राहणार? उद्धव-राज मनोमिलनात 3 गेमचेंजिंग मुद्दे, ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्हच
‘आपल्या नेतृत्वात शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरू आहे. आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या, आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे, पण आपल्या राज्यात गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करून स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे’, अशी त्यांनी पत्रात म्हटले.
ठाकरे बंधू एकत्र येताच प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र, किशोरी पेडणेकरांकडून खरपूस समाचार
‘सत्ता गेल्यामुळे ‘उबाठा’ किती अगतिक झाले आहेत याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येत आहे. ‘उबाठा’चे राजकारण अत्यंत खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे. त्यामुळेच त्यांचा एक एक सहकारी त्यांना सोडून जात आहे. मराठीची टोपी घालून त्यांनी अनेक वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली. परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले. त्यांच्या या टोपीखाली दडलेय काय ?’, असा प्रश्न त्यांनी पत्रात उपस्थित केला आहे. तर, ‘राज ठाकरे यांनी २००६मध्ये ‘मनसे‘ची स्थापना केली त्याला आता १९ वर्षे झाली. ज्या बडव्यांच्या नावाने राज घराबाहेर पडले, त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत’, असे प्सरनाईक यांनी म्हटले आहे.