हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला.. – Marathi News | Sunny Deol makes first big statement on playing Hanuman in Ranbir Kapoor Ramayana admits its not easy


नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सनी देओल त्याच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. सनी देओलने नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिल्या भागात सनी देओलची खूप छोटी भूमिका आहे.

या भूमिकेविषयी चाहत्यांशी बोलताना सनी म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी आताच यावर काम सुरू केलं आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण रामायण आपल्या हिंदुस्तानी लोकांसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. मला हनुमानजींची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी वाहेगुरूजींचे आभार मानतो. ही भूमिका साकारणं अजिबात सोपं नाही. पण हा प्रवास खूप मजेशीर आहे. हनुमानजी अत्यंत सामर्थ्यवान, सर्वांचे प्रिय आणि प्रभू राम यांचे एकनिष्ठ भक्त आहेत. नमित यांनी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असा एक भव्य चित्रपट साकारला आहे.”

पहा व्हिडीओ

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’ या भव्य चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हनुमान जयंतीचं निमित्त साधत या चित्रपटातील प्रभू राम यांची झलक सादर करण्यात आली होती. आठ वेळा ऑस्कर पुरस्कार विजेता व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ डीएनईजी आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने हा भव्यदिव्य चित्रपट साकारण्यात आला आहे. हजारो वर्षांपासून जपली गेलेली रामायणाची कथा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून मांडण्यात येत आहे. या चित्रपटात कलाकारांची मोठी फळीच पहायला मिळणार आहे. केजीएफ स्टार यश यामध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रामायण हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या दोन्ही चित्रपटांचं एकूण बजेट अंदाजे 4000 कोटी रुपये आहे. त्यामुळे आतापर्यंतचा हा सर्वांत महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, सनी देओल, रवी दुबे यांच्या भूमिका आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *