नीट परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. थेट संसद भवनाकडे मोर्चा निघाला. आता हा मोर्चा संसद भवनाच्या परिसरात पोहोचला आहे. संसदेचे गेट बंद करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक रूग्णालयात आहेत. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्र दिले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संसद भवनाच्या परिसरात गोंधळ उडाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरिता आंदोलक आक्रमक झाली आहेत. यादरम्यानच दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. संसद भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. अभिजीत दिपके संसद भवनाकडे जाण्यासाठी आग्रही आहेत. अश्रूधुराच्या नळकांड्या फेकल्या आहेत. आंदोलकांना पांगवण्याचे काम सुरू आहे. संसदेचे मुख्य गेटही बंद करण्यात आले.
संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. कारण आंदोलकांची मुख्य मागणी आहे की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. सोनम वांगचुक यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत भाष्य केले. पण त्यांनी सरकार पुढे 3 महत्वाच्या अटी ठेवल्या आहेत.
कॉक्रोच जनचा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके संसद भवनाजवळ पोहोचले आहेत. अनेक लोक या आंदोलनात सहभागी झाले. संसदेवरील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा पुढे निघाला. मोठा पोलिस बंदोबस्त संसद परिसरात बघायला मिळत आहे. अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी संसदेकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आहे.
हे आंदोलन आता चिघळताना दिसत आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. कडक बंदोबस्त वाढवण्यात आला. संसदेचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलकांची मोठी संख्या बघायला मिळत आहे. अभिजीत दिपके यांनी उपोषण सोडले आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांना भेटण्यासाठी आता धर्मेंद्र प्रधान पोहोचले आहेत.