देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने ‘बळीराजा’शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Raju Shetti:“मुलगा नोकरीवालाच हवा आणि तो पुणे-मुंबईसारख्या शहरात राहणारा असावा,” या हट्टापायी आज महाराष्ट्रातील गावागावांत हजारो तरुण शेतकरी लग्नाविना बसले आहेत. शेतीला ‘तोट्याचा व्यवसाय’ मानून शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी देण्यास नकार देणाऱ्या आजच्या बुरसटलेल्या सामाजिक मानसिकतेवर कोकणातील एका उच्चशिक्षित मुलीने आपल्या धाडसी निर्णयाने जोरदार प्रहार केला आहे. देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर मुलगी वैष्णवी कदम हिने कोणत्याही कॉर्पोरेट…