Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: सध्या जिकडे तिकडे चर्चा रंगलीय ती, प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ (Deool Bandh 2) सिनेमाची. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचा गल्ला केलाय. साधारणतः 10 वर्षांपूर्वी या सिनेमाचा पहिला भाग ‘देऊळ बंद’ (Deool Bandh) रिलीज करण्यात आलेला. त्या सिनेमालाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालेला. या सिनेमात गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आणि मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकलेला. या सिनेमात एक चिमुकली होती, जिनं केलेल्या चुकीभोवती सिनेमाची कथा फिरत होती. सिनेमातल्या राघव शास्त्रीच्या मुलगी सना. म्हणजेच, अभिनेत्री आर्या घारे (Actress Aarya Ghare). आता आर्या एवढी बदलीय की, तिला ओळखणंही शक्य होत नाहीय. आर्यानं नुकतीच एक मुलाखत दिलीय. त्यावेळी तिनं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यातल्या एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
मराठी अभिनेत्री आर्या घारे (Marathi Actress Aarya Ghare) हिनं मुलाखतीत बोलताना आपल्या वाढदिवसाची आठवण सांगितली. आर्यानं तिचा एक वाढदिवस चक्क स्मशानभूमित साजरा केलेला. आर्यानं नेमकं असं का केलं? त्यावेळी नेमकं काय घडलेलं? याचा सविस्तर प्रसंग तिनं सांगितला. नेमकं आर्या काय म्हणाली? सविस्तर सांगूयात…
‘देऊळ बंद’ फेम अभिनेत्री आर्या घारे नेमकं काय म्हणाली? (Aarya Ghare Celebrated Birthday At Cremation)
इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीती बोलताना अभिनेत्री आर्या घारे म्हणाली की, “मी माझा बर्थडे स्मशानभूमीमध्ये सेलिब्रेट केलेला. माझा वाढदिवस 9 ऑगस्टला असतो, 6-7 ऑगस्टला मी एक आर्टिकल वाचलं होतं, ज्यात नागपूर की, नाशिकमध्ये पाच वर्षाच्या मुलीचा जीव गेला… कारण तिचे आई-बाबा आणि मावशीला वाटलेलं की, तिच्या अंगात भूत आहे. त्यामुळे त्यांनी त्या लहान मुलीला इतकं मारलं की, त्यांच्या मते मारल्यावर ते भूत तिला सोडून जाईल… पण त्या मुलींनं आपला जीवच सोडला. मी ते आर्टिकल वाचलं आणि माझं असं झालं की, हे काय चालू आहे. कुठे चाललोय आपण… ठीक आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा गोष्टी असतात, पण आपण त्याचा एवढा बाऊ नाही केला पाहिजे…”

“तेव्हा मी माझ्या मम्माला म्हणाले की, मला मला स्मशान भूमीमध्ये माझा बर्थडे सेलिब्रेट करायचाय. यावर ती मला म्हणाली नाही…! तू वेडी आहेस का? तू पागल आहेस का? बावळट आहेस का…? ती काही ऐकायला तयार नव्हती, त्यामुळे मी एक पोस्ट बनवली आणि 8 ऑगस्टला माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर ती अपलोड केली की, मी उद्या स्मशानभूमीमध्ये माझा वाढदिवस साजरा करतेय. जर तुम्ही मला सपोर्ट करत असाल तर या… ती पोस्ट माझ्या आईनं पण बघितली, त्यानंतर ती मला खूप ओरडली… पण मी तिला म्हटलं की, आता पोस्ट मी टाकली, त्यामुळे मला तिथे जावंच लागेल आणि माझा वाढदिवस साजरा करावाच लागेल. मग आई पण म्हणाली ठीक आहे, तू आता टाकली असणार मग कर तिथे सेलिब्रेट मी आहे तुझ्यासोबत…”, असं आर्या घारे म्हणाली.
पुढे बोलताना आर्या घारेनं सांगितलं की, “मग दुसऱ्या दिवशी मी भोसरी येथे स्मशानभूमी आहे, तिथे मी माझा बर्थडे सेलिब्रेट केलाय. त्या वाढदिवसाला माझ्या नातेवाईकांपेक्षा पत्रकार लोक जास्त होते. केवळ मराठी हिंदीच नव्हे, तर साऊथ कडील चैनलमध्ये सुद्धा ती न्यूज लावली होती…”
“तरीही आपल्याला तिथेच मुक्ती का मिळते?”
“असं म्हणतात की, स्मशानभूमीत निगेटिव्ह एनर्जी असते. आपण कोणाच्या मयताला जरी गेलो, तरी घरी येऊन अंघोळ करतो, कारण ती निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असू नये. पण मला कळत नाही की, तिथे काय निगेटिव्ह एनर्जी असेल? आणि जर असली तरीही आपल्याला तिथेच मुक्ती का मिळते? स्मशानभूमीत तुम्ही श्रीमंत आहात गरीब आहात, उंच की बुटके आहात? हे काहीच विचारत नाही. अंतिम सत्य तेच आहे… काहीही झालं तरी शेवटी तुम्हाला तिथेच जायचंय. तुम्हाला जर तिथे मुक्ती भेटत असेल तर ते ठिकाण निगेटिव्ह कसं? एक भारतातील तरुणी म्हणून पुढे येऊन कोणीतरी बोललं पाहिजे होतं की, श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नको म्हणून मी हे केलं… मला या गोष्टीची भयंकर चीड आहे की, कोणीही अंधश्रद्धा ठेवू नये…”, असं आर्या घारे म्हणाली.
आर्याने पुढे सांगितलं की, “या गोष्टीनं मी खूपच ट्रोल झालेले. कमेंटमध्ये काहींनी लिहिलेलं की, लग्नसुद्धा स्मशानातच कर वगैरे… पण मी आधी म्हटल्याप्रमाणे मी सगळ्यांच्या मतांचा आदर करते, पण मला हे करायचं होतं… कदाचित मला या मार्गानेच तुमच्यापर्यंत पोहोचता आलं असतं, त्यामुळे मी स्मशानात बर्थडे केला. तो एकच बर्थडे मी तिथे केलेला, पण एरव्ही मी कधीच माझा बर्थडे पार्टीसारखा सेलिब्रेट करत नाही. माझे जास्त फ्रेंड्स नाहीत. नेहमी माझा बर्थडे गोशाला, अनाथाश्रम, अंध व्यक्तींसोबत सेलिब्रेट केलेत…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :