Numerology: कधी कधी आपण अशा जोडप्यांना पाहतो, ज्यांना पाहताच क्षणी जणू असे वाटते की, या दोघांची जोडी जणू स्वर्गातच बांधली असावी. आजकाल जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत असताना काही जोड्या मात्र एकमेकांसोबत सुखाने नांदतात. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर आज आपण अशा काही जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांना ‘स्वर्गात बनलेली’ जोडी मानले जाते, यांच्या वर राहू-केतूचा भरभरून आशीर्वाद असतो, अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया…
‘या’ जन्मतारखांना ‘स्वर्गात बनलेली’ जोडी का मानले जाते? अंकशास्त्र सांगते…(Numerology)
अंकशास्त्रानुसार, ज्यांची जन्मतारीख 4, 13, 23, 31 आहे, त्यांचा मूलांक 4 असतो, तर ज्यांची जन्मतारीख 7, 16, 25 आहे, त्यांचा मूलांक 7 असतो, हे लोक एकमेकांशी खूप चांगले जुळवून घेतात. खरं तर, अंकशास्त्रानुसार, या अंकांच्या जोडीला ‘स्वर्गात बनलेली’ मानले जाते. अंकशास्त्रानुसार, याचे कारण जाणून घेऊया.
राहू – केतूचं अनोखं नातं…
अंकशास्त्रानुसार, राहू हा अंक 4 चा स्वामी आहे, तर अंक 7 केतूशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, राहू आणि केतू हे वेगळे घटक नसून, ते स्वर्भानू नावाच्या एकाच राक्षसाचे दोन अर्धे भाग आहेत. यामुळेच, जेव्हा अंक 4 आणि 7 मूलांकाचे लोक लोक भेटतात, तेव्हा त्यांच्यात एक विशेष नाते निर्माण होते. हे लोक केवळ चांगले मित्रच बनत नाहीत, तर अत्यंत यशस्वी जोडीदारसुद्धा ठरतात. या अंकांच्या जोड्यांची अनेक उदाहरणे आहेत.
व्यावहारिक मन, भावनिकतेचा समतोल
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चे लोक अत्यंत व्यावहारिक, तार्किक आणि जमिनीवर पाय ठेवणारे असतात, तर ज्यांचा अंक 7 असतो ते भावनिक, संवेदनशील आणि आध्यात्मिक असतात. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हा एक सुंदर नाते निर्माण होते, ज्यात आर्थिक सुरक्षिततेपासून ते आदर आणि प्रेमापर्यंत सर्व काही सामावलेले असते. अंक 4 आर्थिक सुरक्षा प्रदान करतो, तर अंक 7 प्रेम, सखोलता आणि समाधान प्रदान करतो.
न बोलता समजून घेणं.. एकमेकांना आधार देणं..
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चे लोक कधीकधी जास्त विचार केल्यामुळे गोंधळून जातात आणि रागावतात, तर अंक 7 असलेले लोक त्यांच्या शांत स्वभावाने आणि सखोल समजुतीने त्यांना हाताळतात. याउलट, जेव्हा अंक 7 असलेले लोक कधीकधी नैराश्याने ग्रस्त होतात, तेव्हा अंक 4 चा व्यावहारिक स्वभाव त्यांच्यात नवीन ऊर्जा भरतो. अंकशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, अंक 4 आणि 7 असलेल्या लोकांचे नाते खूप घट्ट असते, ज्यात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. ते न बोलताही एकमेकांच्या भावना त्वरित समजून घेतात.
हेही वाचा :
Shravan 2026: श्रावण महिना..अध्यात्म – निसर्गाचा सुंदर संगम! कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)