सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाचं स्फोटक अर्धशतक आणि विकेटकीपर ऋचा घोष हीने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर वुमन्स टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात (Icc Womens T20i World Cup 2026) आपली तिसरी आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 8.55 च्या रनरेट धावा कराव्या लागणार आहेत. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 170 रन्स केल्या. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी सलामी देणार की पाकिस्तान मैदान मारणार? हे काही वेळातच स्पष्ट होईल.