Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं


Morena Train Accident: मध्य प्रदेशातील मोरेनात उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरल्याने, घाबरलेले प्रवासी रुळांवर उतरले आणि त्यांना दुसऱ्या ट्रेनने धडक दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, या अपघातात आणखी चार जणांचा मृत्यू झाला.उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेस मोरेना जिल्ह्यातून धावत होती. हेतमपूर स्टेशनजवळ पोहोचताच ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. हे ऐकताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घाबरून, त्यांनी कोणताही विचार न करता ट्रेनमधून उडी मारली आणि जीव वाचवण्यासाठी रेल्वे रुळांवर धाव घेतली.

ट्रेनने रुळांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली

जे लोक रुळांवर उतरले होते, त्यांना याची कल्पना नव्हती की बाजूच्याच रुळावरून पातालकोट एक्स्प्रेस भरधाव वेगाने येत आहे. पातालकोट ट्रेनने रुळांवर उभ्या असलेल्या या प्रवाशांना धडक दिली. हा अपघात इतका अचानक आणि भीषण होता की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 6 जणांचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला. रेल्वे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली आणि बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. आगीची अफवा कुठून पसरली, कोणी मुद्दाम ही अफवा पसरवली की हा गैरसमज होता? तपास सुरू करण्यात आला आहे.

ट्रेनमधील प्रवाशाने काय सांगितले?

ट्रेनमधील एका महिला प्रवाशाने सांगितले, “अचानक कोणीतरी साखळी ओढली आणि ओरडले, ‘आग लागली आहे, आग लागली आहे.” लोक लगेच खाली उतरू लागले. प्रवासी रेल्वे रुळ ओलांडत असताना, दुसऱ्या बाजूने पातालकोट एक्स्प्रेस येत होती. काही लोक ट्रेनमध्ये अडकले, ज्यामुळे अपघात झाला. एक संपूर्ण कुटुंब अडकले होते. त्यात पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले होती.” त्या महिलेने सांगितले की, ती बहादूरगडहून डबराकडे जात होती. ती म्हणाली, “मी पातालकोट ट्रेनमध्ये होते. ज्या ट्रेनबद्दल आगीची अफवा पसरली ती उदयपूर सिटी एक्स्प्रेस होती.”

अपघात नेमका कसा घडला?

मध्य प्रदेशातील मोरेनात उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा ऐकून प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारली, त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या पातालकोट ट्रेनने अनेक प्रवाशांना धडक दिली. उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस रविवारी सायंकाळी 4 वाजता मोरेनाहून धोलपूरसाठी निघाली होती. हेतमपूर स्टेशनवर ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली. आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. घाबरलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी विचार न करता ट्रेनमधून उडी मारली, पण ते दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत सापडले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत तीन महिला आणि एका मुलाचे मृतदेह सापडले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *