Ind vs Pak T20 World Cup 2026 : अरुंधति IN, रेणुका OUT… टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना, अशी असेल भारताची Playing XI


India vs Pakistan ICC Women’s T20 World Cup 2026 : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 ला जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगला. आता सर्वांच्या नजरा भारत-पाकिस्तान महामुकाबल्याकडे लागल्या आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ रविवारी (14 जून) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या हायव्होल्टेज लढतीपूर्वी भारतीय संघाची अंतिम प्लेइंग-11 कशी असेल, याबाबत मोठी उत्सुकता आहे. मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्यासमोर संघनिवडीचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी आपली ‘परफेक्ट’ भारतीय प्लेइंग-11 निवडली आहे. 

जेमिमाहऐवजी यास्तिका तिसऱ्या क्रमांकावर खेळणार…

स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लॅन’ या कार्यक्रमात बोलताना अभिषेक नायरने आपला संघ निवडला. त्याने सलामीच्या जोडीमध्ये कोणताही बदल केला नाही, परंतु तिसऱ्या क्रमांकाच्या जागेबाबत एक नवीन बदल केला आहे. अभिषेकच्या मते, शफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी डावाची सुरुवात करणे सर्वोत्तम ठरेल. नायरने जेमिमाह रॉड्रिग्जच्या जागी, सध्या फॉर्मात असलेल्या यास्तिका भाटियाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे. यास्तिकाच्या नंतर, जेमिमाह चौथ्या क्रमांकावर आणि कर्णधार हरमनप्रीत कौर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

राधा यादवला संधी, रिचा घोष फिनिशर

मधल्या खालच्या फळीत, नायरने भारती फुलमालीऐवजी राधा यादवला पसंती दिली आहे. त्याने पॉवर-हिटिंग कौशल्य असलेल्या स्फोटक फलंदाज रिचा घोषला सहाव्या क्रमांकावर स्थान दिले आहे. नायर म्हणाले, “दीप्ती शर्मा सातव्या क्रमांकावर असेल.” यानंतर भारती फुलमली आणि राधा यादव यांच्यात निवड करायची होती. ज्या प्रकारे राधा फलंदाजी करत आहे आणि संघाला डावखुरा फिरकी गोलंदाजीचा पर्याय देत आहे, त्यामुळे मी तिलाच पसंती देईन.

रेणुका ठाकूर बाहेर, अरुंधती आणि क्रांतीचा संघात समावेश

अभिषेक नायरच्या प्लेइंग इलेव्हनला सर्वात मोठा धक्का म्हणजे वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर, जिला त्याने संघात स्थान दिलेले नाही. तिच्या जागी, नायरने अरुंधती रेड्डी, श्री चरानी आणि क्रांती गौड यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे, ज्या यावर्षी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

हे तीन खेळाडू ठरतील ‘एक्स-फॅक्टर’ 

नायरने या स्पर्धेत भारताच्या विजयासाठी तीन खेळाडूंना सर्वात मोठे गेम-चेंजर म्हणून ओळखले आहे. नायर यांच्या मते, इंग्लंडमधील खेळपट्टीवर नवीन चेंडू स्विंग होईल, त्यामुळे पॉवरप्लेमध्ये क्रांती गौडची गोलंदाजी भारतासाठी निर्णायक ठरेल. नायर यांच्या मते, श्री चरणी ही भारतीय गोलंदाजी आक्रमणातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. त्यांनी शेफाली वर्माला तिसरा ‘एक्स-फॅक्टर’ म्हणून ओळखले आहे. पॉवरप्लेमधील शेफालीच्या आक्रमक दृष्टिकोनामुळे स्मृती मंधानाला स्थिरावण्यासाठी वेळ मिळेल, ज्यामुळे भारताला एक चांगली सुरुवात करता येईल.

अभिषेक नायर यांनी निवडलेला भारताचा प्लेइंग-11

शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, क्रांती गौड.

हे ही वाचा –

India vs Ireland T20 Series : आयर्लंडमध्ये हिंसाचार पेटला, टीम इंडियाविरुद्धची टी-20 मालिका होणार रद्द?, 48 तासांचा अल्टिमेटम, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *