भारत आणि इंग्लंडविरुद्ध यांच्यात वनडे आणि टी-20 मालिका पार पडली. जी भारतीय संघाने गमावली. भारतीय संघानी एक नाही तर दोन्ही मालिका गमावल्यामुळे आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भारतीय संघात एकवेळी आता अनेक मोठे बदल केले आहेत. संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघातील निवडीवर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मालिका गमावल्यानंतर आता कर्णधार शुभमन गिलच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. गिलला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. मालिकेतील निर्णायक आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताने चार वेगवान गोलंदाज आणि अक्षर पटेलला एकमेव मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अक्षरला एकही बळी घेता आला नाही आणि त्याने 10 षटकांत 61 धावा दिल्या.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कुलदीपला संघातून वगळण्यामागचे कारण विचारले असता, कर्णधार शुभमन गिलने आपली रणनीती स्पष्ट केली. तो म्हणाला, “मागील सामन्यांमध्ये आमच्या लक्षात आले होते की खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना फारशी मदत करत नव्हत्या. जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाज गोलंदाजीला यायचे, तेव्हा आम्हाला थोडी बचावात्मक भूमिका घ्यावी लागायची, तर दुसरीकडे वेगवान गोलंदाजांच्या आगमनाने काहीतरी घडणार आहे असे आम्हाला नेहमी वाटायचे. संघात अतिरिक्त फिरकी गोलंदाजाचा समावेश न करण्यामागे हेच कारण होते.”
मात्र, 387 धावांच्या विशाल धावसंख्येचा बचाव करताना इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली, तेव्हा भारतीय कर्णधाराचा युक्तिवाद पूर्णपणे पोकळ ठरला. आदिल रशीद आणि विल जॅक्स यांच्याव्यतिरिक्त, अर्धवेळ फिरकी गोलंदाज जेकब बेथेलनेही उत्कृष्ट गोलंदाजी करत 138 धावांवर फलंदाजी करत असलेल्या शतकवीर रोहित शर्माला बाद करून भारताचे कंबरडे मोडले. खेळपट्टीचे बदलणारे स्वरूप आणि आपल्या रणनीतीबद्दल स्पष्टीकरण देताना गिल पुढे म्हणाला, “कदाचित विचार केल्यावर असे वाटते की खेळपट्टी थोडी संथ झाली होती. जेव्हा आम्ही गोलंदाजी करत होतो आणि अक्षर भाई गोलंदाजी करत होते, तेव्हा खेळपट्टी इतकी संथ होईल असे वाटले नव्हते. पण जेव्हा इंग्लंडचे गोलंदाज आले, तेव्हा खेळ जसजसा पुढे सरकला तसतशी खेळपट्टी बऱ्यापैकी संथ झाली.”
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील सध्याचे संघ व्यवस्थापन अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. कुलदीप यादवची फलंदाजी अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्याइतकी मजबूत नसल्यामुळे, त्याला अनेकदा अंतिम अकरा खेळाडूंमधून वगळले जाते. केवळ आपल्या गोलंदाजीच्या क्षमतेच्या जोरावर संघात स्थान मिळवणे त्याच्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.