आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा दुसरा सामना नेदरलँडशी झाला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण भारताने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आक्रमक सुरूवात केली. भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 209 धावा केल्या. तसेच नेदरलँडला 95 धावांनी नमवलं. यासह विक्रमाची नोंद केली. (Photo: BCCI Twitter)
भारतीय महिला संघाने टी20 वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 200 धावांचा पल्ला गाठला. या आशियाई देशातील पहिला देश होण्याचा मान भारतीय संघाने मिळवला आहे. यापूर्वी आशियाई देशाला वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ही कामगिरी करता आला नाही. (Photo: BCCI Twitter)
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारतीय महिला संघाने केलेली हा तिसरी मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी इंग्लंडने या स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध 219 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 213 धावा केल्या होत्या. आता भारताने टॉप 3 मध्ये एन्ट्री मारली आहे. (Photo: BCCI Twitter)
भारतीय महिला संघाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथी मोठी धावसंख्या केली आहे. यापूर्वी 2025 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 221, 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 217, 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध 210 धावा केल्या होत्या. आता नेदरलँडविरुद्ध 209 धावा केल्या. (Photo: BCCI Twitter)
भारताने नेदरलँडला 95 धावांनी पराभूत करून पाचवा मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी 2018 मध्ये मलेशियाला 142 धावांनी, युएईला 2022मध्ये 104 धावांनी, 2022 मध्ये बार्बाडोसला 100 धावांनी, 2025 मध्ये इंग्लंडला 97 धावांनी आणि आता नेदरलँडला 95 धावांनी नमवलं आहे. (Photo: BCCI Twitter)




