फलंदाज म्हणून फक्त ही श्रेयस अय्यरची चूक नाहीय, तर अन्य फलंदाजांची सुद्धा तितकीच चूक आहे, जे परफॉर्म करु शकले नाहीत. मालिका पराभवासाठी श्रेयसला जबाबदार धरलं जाईल. पण ड्रेसिंग रुममधला जो मोठा प्रश्न आहे, त्या बद्दल कोणी बोलत नाहीय. आता पाणी डोक्यावरुन गेलय, त्यावर बोललं पाहिजे असं मनोज तिवारी म्हणाले.