यावर आकांक्षाने अत्यंत बिंधास्त उत्तर दिले होते की, ” हो का नाही, जर एखादी महिला तिच्या वैवाहिक आयुष्यात शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या आनंदी नसेल, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ शकतो आणि हे देखील घटस्फोटाचे एक मुख्य कारण असू शकते. दुर्दैवाने आपण ज्या समाजात राहतो तिथे आजही महिलांच्या खाजगी आयुष्याशी आणि इच्छांशी जोडलेल्या गोष्टींना एक टॅबू मानले जाते, जे चुकीचे आहे.”आता यावरुन तर आकांक्षा आणि गौरव यांचा घटस्फोट होत नाहीये ना असा अंदाज लावला जात आहे.