बाळाचं नाव हे फक्त त्याची ओळख नसतं, तर त्या नावामध्ये भावना, संस्कार आणि आपल्या अपेक्षाही दडलेल्या असतात. म्हणूनच, प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाचं नाव हे नेहमीच खास, अर्थपूर्ण आणि प्रेरणा देणारं असावं असं वाटतं. पौराणिक शूरवीर, देवी-देवता आणि महान योद्ध्यांवरून ठेवलेली काही नावं तर वर्षानुवर्षे लोकांच्या आवडीची राहिली आहेत.
