Hardik Pandya: ‘हार्दिककडून कर्णधार म्हणून अपेक्षेसारखी कामगिरी झाली नाही, पुढील वर्षी संघात बदल होणार’, पॉलार्डनं मनातलं सगळं सांगून टाकलं


मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामातील साखळी सामने 24 मे रोजी संपले, ज्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. या हंगामात हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. मुंबई इंडियन्सचा संघ पाहता, ते प्लेऑफमध्ये पोहोचतील अशी अपेक्षा होती. मात्र, साखळी टप्प्यात कोणालाही अपेक्षित नसलेली निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. आता या खराब हंगामानंतर बॅटिंग कॉच कायरन पॉलार्डने कर्णधार हार्दिक पंड्याबद्दल एक विधान केले आहे.

हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित

मुंबई इंडियन्स 8 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर राहिला. आता, हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडल्याच्या मुद्द्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे आणि साखळीतील शेवटच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर, मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरोन पोलार्ड यांनी पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

पॉलार्ड म्हणाले की, “कर्णधार म्हणून हार्दिकने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. व्यवस्थापनाला जशी आशा होती तसे झाले नाही. हे स्पष्ट आहे की, कर्णधार म्हणून यशस्वी होण्यासाठी आम्ही त्याला प्रत्येक संधी देण्याचा प्रयत्न केला. 14 सामन्यांतील 10 पराभवांसाठी तुम्ही केवळ एका खेळाडूला दोष देऊ शकत नाही; हा आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. आम्ही सर्वांनी प्रयत्न केला, पण गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाहीत.”

मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2026 चा हंगाम साखळी टप्प्यातच संपल्यानंतर, पुढील वर्षीच्या हंगामापूर्वी मोठे बदल अपेक्षित आहेत, ज्यात संघातून काही खेळाडूंना वगळण्याची शक्यता आहे. पोलार्ड यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले, “आता सुधारणा करण्याची वेळ आहे आणि पुढील हंगामासाठी संघाला सर्वोत्तम काय अनुकूल ठरेल यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला एकत्र बसण्याची गरज आहे. आम्ही यात घाई करू शकत नाही; आम्हाला प्रत्येकाला थोडा वेळ द्यायचा आहे, कारण ही भावनिक निर्णय घेण्याची वेळ नाही.”

मुंबईने या हंगामात 14 पैकी फक्त चार सामने जिंकले, उर्वरित दहा सामन्यात त्यांना पराभवाचा फटका बसला आहे. या हंगामात मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग अपयशी ठरले. मुंबईने या हंगामात अनेक बदल केलेले पाहायला मिळाले पण विजयी होण्यात अपयशीच ठरले. मुंबईने या हंगामात अनेक युवा खेळाडूंना पदार्पणची संधी ही दिली ही पण तेही विशेष काहीच करु शकले नाही. आता मुंबई इंडियन्स पुढील हंगामासाठी काय बदल करते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

सलोनी पाटील

लेखकाबद्दलसलोनी पाटीलसलोनी पाटील या सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. गेल्या ३ वर्षांपासून पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय आहे.
सलोनी गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करत आहेत आणि क्रीडा व बिझनेस क्षेत्रातील चालू घडामोडींवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे
सलोनी यांनी सामना, एबीपी माझा या ठिकाणी इंटर्नशीप केली आहे. ‘आम्ही पार्लेकर’ वृत्तपत्रात कॉ-ऑर्डिनेटर म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.
हेमा मालिनी संपादक असलेल्या ‘मेरी सहेली’ येथे सोशल मीडिया आणि व्हिडिओ एडिटर म्हणून काम. करण्याचा अनुभव आहे. ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये रिपोर्टर म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. सलोनी यांनी साठ्ये कॉलेजमधून BMM चे शिक्षण आणि त्यानंतर कम्युनिकेशन अँड जर्नलिज्ममध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे.
आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *