Last Updated:
Jayant Patil meet CM Fadnavis : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
मुंबई: ‘ऑपरेशन टायगर’नंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाची देखील चर्चा सुरू असते. अशातच मंगळवारी रात्री, मोठी घडमोड झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. वर्षावर बंगल्यावर झालेल्या या बैठकीबाबत जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट होत नाही तेच शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. एकापाठोपाठ दोन्ही गटाच्या प्रमुख शिलेदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.. राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांन उधाण आले होते. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १० पैकी ९ आमदारांची गुप्त बैठक झाली. या बैठकीत त्यांनी भाजपसोबत जाण्याची चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मंगळवारी, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्याची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक झाल्याने एकच खळबळ उडाली.
जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, वर्षावरील बैठक ही…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी वर्षावरील बैठकीबाबत माहिती दिली. जयंत पाटील यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांसोबतची भेट नियोजित होती. ईश्वरपूर नगराध्यक्षांना अपात्र केल्यानं संबंधित विषयासाठी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
प्रफुल पटेल आणि तटकरे यांच्यासोबतच्या भेटीबाबत जयंत पाटील यांनी कानावर हात ठेवले. पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांसोबत भेट झाली नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही नेते वर्षावर होते, याची माहितीदेखील नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. वर्षावरील भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
Mumbai,Maharashtra
