काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंत कर्जमाफी केली. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. परंतु या कर्जमाफीवर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील क्रांतीकारी शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला. ही कर्जमाफी फसवी असल्याचे म्हणत विधानभवनाबाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस फेकत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.