मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. काल सचिन अहिर यांच्या रुपाने विधान परिषदेतील एक आमदार फुटला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या परखड शैलीत भाष्य केलं. ऑपरेशन टायगरवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी फुटलेल्यांच्या जिव्हारी लागेल असं उत्तर दिलं. “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीय, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर गिऱ्हाईक आहेतच. जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडं आहे. कुठल्या पद्धतीचं हे राजकारण सुरु आहे. मला वाटतं लोकांमध्ये या बद्दल प्रचंड संताप आहे” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
(बातमी अपडेट होत आहे)