या वेब सीरिजने एका आठवड्यातच ट्रेंडिंग यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. या वेब सीरिजचे एकूण वीस एपिसोड्स आहेत. आपल्या पतीची राख गोळा करणाऱ्या एका महिलेची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर कुलदीप, जो सीतापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होता, त्यानेच तिच्या वडिलांची आणि पतीची हत्या केली होती. यामुळे दोघांमध्ये पराकोटीचा द्वेष निर्माण होतो.