राज कपूर, दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या फळीतील हा अभिनेता, ज्याने 1950 चा काळ गाजवला. त्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक. अभिनेता कमालीचा श्रीमंत. मुंबईत अनेक बंगले, गाड्या होत्या. गडगंज श्रीमंतीत जगला, पण आयुष्याच्या शेवटी त्याचा खिसा रिकामा राहिला. त्याच्या अंत्यसंस्काराला फक्त 8 लोक आले होते असं म्हणतात.
