Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक


Virat Kohli and Rohit Sharma Record कार्डिफ : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी   60 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटी, वनडे आणि टी 20 या तीन फॉरमॅटमध्ये भारतासाठी 8 हजारांहून अधिक धावांची भागीदारी केली. या दोघांनी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड, केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांना मागं टाकलं. 

भारतासाठी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोघांनी भागीदारी करताना सर्वाधिक 12400 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड आहेत. दोघांच्या भागीदारीतील धावांची संख्या 11037 होती.   

भारतासाठी तीन फॉरमॅटमध्ये मिळून भागदारी

12400 धावा: सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली
11037 धावा: सचिन तेंडुलकर – राहुल द्रविड 
8028 धावा: रोहित शर्मा – कोहली विराट कोहली *
7626 धावा: सौरव गांगुली – राहुल द्रविड द्रविड़
7199 धावा: विरेंद्र सेहवाग – गौतम गंभीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला असता कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचं नाव पहिल्या स्थानी आहे. दोघांची सर्व फॉरमॅटमधील भागीदारीतील धावसंख्या 13368 इतकी आहे. केन विल्यमसन आणि रॉस  टेलर यांच्या 8018 धावा आहेत.

रोहित शर्मा विराट कोहलीची दुसऱ्या वनडेत 60 धावांची भागीदारी

कार्डिफमधील दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. यामध्ये रोहित शर्मानं 17 आणि विराट कोहलीचं 36 धावांचं योगदान होतं.  रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली होती. गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला होता.  रोहित शर्मा चांगली सुरुवात मिळाल्यानंतर 26 धावा करुन बाद झाला. तर, विराट कोहलीनं 65 धावा केल्या.   

भारताला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. इशान किशन एक रन करुन बाद झाला. तर, पहिल्या वनडेत भारताला विजय मिळवून देणारे वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल अपयशी ठरले. शिवम दुबेला खातं देखील उघडता आलं नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 2 आणि अक्षर पटेल 1 रन करुन बाद झाला. 

विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही पहिल्या वनडेत अपयशी ठरले होते. रोहित शर्मानं 11 आणि विराट कोहलीनं 5 धावा केल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये त्या दोघांनी चांगली फलंदाजी केली. 

दरम्यान, भारताला दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवत मालिका जिंकण्याची संधी आहे. भारतानं पहिल्या वनडेत विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  आज विजय मिळवल्यास भारत ही मालिका जिंकून टी 20 मालिकेतील पराभवाचा वचपा काढू शकतो. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *