Vaibhav Sooryavanshi : अंधार पडला, अंपायरने निर्णय बदलला… अन् वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला! मग भारत-श्रीलंका मॅचमध्ये जे झालं त्याने क्रिकेट जग हादरलं, पाहा Video


Sri Lanka A vs India A Tri Nation A Series : दांबुला (श्रीलंका) येथे खेळल्या गेलेल्या भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामना संपल्यानंतर वैभव आणि श्रीलंकान खेळाडूंमध्ये जोरदार राडा झाला, ज्यामध्ये एकमेकांना ढकलण्यापर्यंत वेळ आली. हा वाद सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सुरू झाला. भारत अ संघाला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 8 धावांची गरज होती. श्रीलंकेचा गोलंदाज कुगाथास मथुलन याने वैभवला एक अचूक यॉर्कर टाकला, ज्यावर वैभवला शॉट मारता आला नाही. सामना जिंकताच गोलंदाज मथुलन आणि श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी सेलिब्रेशन सुरू केलं.

वैभवचा पारा का चढला? (Vaibhav Sooryavanshi Sri Lanka A vs India A)

 मथुलनने ज्या पद्धतीने वैभवच्या तोंडासमोर जाऊन सेलिब्रेशन केलं किंवा त्याला काहीतरी डिवचणारे शब्द बोलले, ते वैभवला सहन झाले नाही. तसेच, खराब प्रकाश असतानाही सुपर ओव्हर खेळवली गेल्याने वैभव आधीच नाराज होता. सामना संपल्यानंतर दोन्ही बाजूचे खेळाडू आमनेसामने आले. वैभवचा राग अनावर झाला आणि त्याने एका श्रीलंकान खेळाडूला थेट धक्का दिला. यानंतर दोन्ही संघांत तीखी शब्दयुद्धाची चकमक उडाली. मागे हटतानाही वैभव सतत प्रतिस्पर्धी खेळाडूंना खडे बोल सुनावत होता.

निरोशन डिकवेलाने मिटवला वाद

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू निरोशन डिकवेला याने मध्यस्थी केली. त्याने वैभवला बाजूला नेले आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. सामना संपल्यावर हस्तांदोलन (Handshake) करतानाही वैभवच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता, शेवटी भारतीय सहकाऱ्यांनी त्याला पकडून पॅव्हेलियनमध्ये नेले.

सामन्यात नेमकं काय घडलं? (Sri Lanka A beat India A in super over Tri Nation A Series)

50 षटकांच्या सामन्यात दोन्ही संघांनी 265-265 धावा केल्यामुळे सामना टाय झाला. अंधार पडत असल्याने पंच सुपर ओव्हर घेण्यास उत्सुक नव्हते. पण भारतीय कर्णधार तिलक वर्माने पंचांशी बराच वेळ चर्चा केली आणि सुपर ओव्हर खेळवण्याची मागणी केली. श्रीलंकेच्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर भारताच्या अर्शद खानने फुलटॉस टाकला, ज्यावर कॅच उडाला आणि पंचांनी आउट दिले. भारतीय संघ जल्लोष करत मैदानाबाहेर गेला. पण रिप्लेमध्ये तो चेंडू कमरेच्या वर (No-Ball) असल्याचे दिसल्याने पंचांनी निर्णय बदलला आणि भारतीय खेळाडूंना पुन्हा मैदानावर बोलावले. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये 16 धावा केल्या. नंतर भारतीय संघ 6 धावांनी हरला आणि फक्त 10 धावाच करू शकला.

हे ही वाचा –

IND A Vs SL A : भारत-श्रीलंका सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! आधी तिलक वर्मा अंपायरशी भिडला, नंतर वैभव सूर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना मारायला पळाला, नेमकं काय घडलं? Video



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *