Rahu Graha Upay : कुंडलीत राहू खराब असल्यास राशीनुसार करा हे सोपे उपाय,सर्व अडचणी होतील दूर !


राहु हा छाया ग्रह म्हणून ओळखला जातो. तसेच राहुला ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह देखील म्हणतात. अनेकजण राहुला घाबरतात कारण तो कुंडलीत खराब स्थानी असला कि व्यक्तीला अत्यंत पीडा देतो. राहुला कधीही शुभ किंवा अशुभ म्हणू शकत नाही. ज्या राशीत राहु बसतो, त्या ग्रहांच्या गुणांनुसार तो शुभ किंवा अशुभ ठरतो. मात्र राहु व्यक्तीला रातोरात यश देतो. सोशल मीडियावर ज्या व्यक्ती अचानक प्रसिद्धीत येतात, अशा व्यक्तींच्या रातोरात चमकायला राहु जबाबदार आहे. राहू ज्या व्यक्तीवर प्रसन्न होतो, त्याला राजा बनवतो मात्र राहु कुंडलीत कमजोर झाल्यास व्यक्तीला अनेक समस्या देतो. चला, जाणून घेऊया कुंडलीच्या १२ स्थानात राहूसाठी करण्यात येणारे उपाय.

राहुचे पहिले भावात परिणाम आणि उपाय
जर राहु कुंडलीतील पहिल्या भावात असेल, तर त्या व्यक्तीच्या मावशी, किंवा वाहिनीची आयुष्यात फार प्रगती होते. पण, जर या भावात राहु अशुभ असेल, तर असा व्यक्ती सर्वांच्या कामात अडथळा आणतो. यासाठी लालकिताबमध्ये लिहिले असल्याप्रमाणे, अशा लोकांनी कायम वाहत्या पाण्यात नाणे टाकायला पाहिजे.
तांबेच्या लोट्यात गुळ घेऊन ते पाणी वाहत्या पाण्यात टाका.

राहुचे दुसऱ्या भावात परिणाम आणि उपाय
राहु जर दुसऱ्या भावात शुभ असेल, तर असा व्यक्ती खुप धनवान असतो. त्यांना सासरकडूनही चांगला फायदा मिळतो. पण, जर या भावात राहु अशुभ असेल, तर आर्थिक अडचणी येऊ शकतात. अशा व्यक्ती मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी देखील चोरी करू शकतात. अशा व्यक्तींनी केसरचा टिळा नेहमी लावावा. तसेच चांदीचे पेंडंट बनवून गळ्यात घालावे.

राहुचे तिसऱ्या भावात परिणाम आणि उपाय

राहु तिसऱ्या भावात शुभ असेल, तर त्या व्यक्तीला आपल्या बहीणीबरोबर पूर्ण सुख मिळते. व्यवसायात वाढ होते. ज्या व्यक्ती नोकरी करत असतात, त्यांना चांगली प्रगती मिळते. अशी व्यक्ती प्रत्येकाच्या मदतीस सदैव तयार असते. पण, जर या भावात राहु अशुभ असेल तर बंधू-भगिनींसोबत वाद होतात. लग्नानंतर सासरकडूनही कमी साथ मिळते. अशा व्यक्तींनी हस्तिदंताच्या वस्तू घरात ठेवू नयेत. हिरवे धने पाण्यात टाकावे.

राहुचे चौथ्या भावात परिणाम आणि उपाय

जर राहु चौथ्या भावात शुभ असेल, तर त्या व्यक्तीच्या आईला सुख मिळते. जागा, जमीन, वाहन यांसारख्या वस्तूंसाठी लाभ होतो. अशा व्यक्ती अतिशय दयाळू असतात. मात्र या भावात राहु अशुभ असेल तर त्यांना आईसाठी कष्ट होते. सासरकडूनही त्रास होतो. अशा व्यक्तीने लाल मसूर डाळ गरीब व्यक्तीला दान करावी.

राहुचे पाचव्या भावात परिणाम आणि उपाय
पाचव्या भावात राहु शुभ असल्यास, व्यक्तीला संतानसुख मिळते. त्यांना सरकारकडून लाभही होतो. जर राहु मीन राशीत असेल, तर व्यक्ती खूप धनाढ्य असतो. पण जर अशुभ असेल तर संतानसुख नाही मिळत. अशा व्यक्ती थोड्या कूटनीती करणाऱ्या असतात. अशा व्यक्तीने मंदिरात दान करावे. घराच्या उंबऱ्यावर चांदीचे नाणे लावावे.

राहुचे सहाव्या भावात परिणाम आणि उपाय
जर राहु सहाव्या भावात असेल, तर अशा व्यक्ती पुढाकाराने काम करतात. शत्रूंवर विजय मिळवतो. विदेशयात्रा योगही अशा लोकांचा बनतो. राहु एखाद्या अडचणीतून अचानक मदत करू शकतो. मात्र जर या भावात राहु अशुभ असेल, तर तो शत्रूंवर मात करत नाही. अचानक पैशांचे नुकसान होऊ शकतात.
यासाठी देवी सरस्वतीची उपासना करावी.

राहुचे सातव्या भावात परिणाम आणि उपाय
या भावात राहू शुभ असल्यास कौटुंबिक सुख मिळते. व्यापार व भागीदारीत फायदा होतो. मात्र इथे जर राहु अशुभ असेल, तर लग्नानंतर जीवन सुखदायक राहत नाही. सासरकडून त्रास होतो, भागीदारांमुळे धनहानी होते. अशा व्यक्तीने 21व्या वर्षात लग्न करू नये. घरात गंगाजल व लाल कपड्यात तांदूळ बांधून ठेवावेत.

राहुचे आठव्या भावात परिणाम आणि उपाय
या भावात राहु बसल्यास व्यक्तीचे भाग्य उजाळते. बँक खातं भरते. सासरकडील संबंधही चांगले राहतात. मात्र राहू इथे अशुभ असल्यास, पैशांचा वापर अति होतो. खर्च वाढतात. कौटुंबिक वाद-विवाद होतो. कोणतीही मदत मिळत नाही. अशा व्यक्तींनी चांदीचा छल्ला किंवा अंगठी घालावी.

राहुचे नवव्या भावात परिणाम आणि उपाय
नवव्या भावात राहु शुभ असल्यास व्यक्तीचे भाग्य लहान वयातच जागरूक होते. प्रवासातून लाभ होतो. अशा व्यक्ती दयाळू, धर्मात्मा असतात. मात्र जर राहु अशुभ असेल तर भाग्य साथ देत नाही. कामे पूर्ण होत नाहीत. संतानसुख कमी मिळते. अशा व्यक्तींनी केसरचा तिलक लावावा.

राहुचे दहाव्या भावात परिणाम आणि उपाय
दहाव्या भावात राहु असल्यास, व्यक्ती सरकारी कामात यश मिळते. वडिलांचे सुख उत्तम असते. ही व्यक्ती माणसांचे चांगले सबुरी असते. समाजात मान मिळते. पण, जर अशुभ असेल, तर वडिलांचे सुख कमी होते. पैतृक संपत्ती जपते. काळे कपडे व काळ्या वस्तू वापरणे टाळा.

राहुचे अकराव्या भावात परिणाम आणि उपाय

जर या भावात राहु शुभ असेल तर व्यक्तीचे उत्पन्न चांगले असते. संतानसुख देखील उत्तम मिळते. मात्र या भावात राहु अनिष्ट असेल तर वडिलांचे उत्पन्न कमी होते. सासरकडील आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. यासाठी उपाय म्हणून चांदीच्या ग्लासात पाणी प्या.

राहुचे बाराव्या भावात परिणाम आणि उपाय
बाराव्या भावात राहु शुभ असल्यास लोकांना विदेशयात्रेत लाभ होतो. विदेशी व्यापारही चांगला होतो. शुभ कामांवर खर्च होतो. सासरकडील नाती चांगली राहतात. मात्र राहू अशुभ असेल तर विदेशयात्रेत नुकसान होते. चुकीच्या कामात पैसा वाया जातो. रात्री झोप येत नाही. उपाय म्हणून कन्यापूजन करावे. महिलांचा सन्मान करावा.

प्रियांका लोंढे

लेखकाबद्दलप्रियांका लोंढेप्रियांका लोंढे महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन सेक्शन मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर आहेत. गेल्या 10 वर्षांपासून मीडिया क्षेत्रात जर्नालिस्ट,कंटेन्ट रायटर म्हणून काम करत आहेत. धार्मिक, सांस्कृतिक,कला,सामाजिक,चित्रपट,वुमन इश्यू,मनोरंजन,वाईल्डलाईफ अशा विविध क्षेत्राशी निगडीत अनेक विषयांवर त्यांनी बातम्या आणि लेख लिहिले आहेत. धार्मिक विषयात लहानपणापासूनच रुची असल्याने व घरातील वातावरण देखील धार्मिक असल्याने त्यांनी पूजापाठ,व्रत,पारायण याची शिकवण आपल्या आईकडून घेतली. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांची आई दत्तगुरूंची सेवा करते. घरात पारायण होतात धार्मिक यात्रा दरवर्षी कुटुंब करते याच गोष्टी त्यांनी बालपणापासून पाहिल्या व आत्मसात केल्या. त्या स्वतः हनुमानजींची भक्ती करतात. आपल्या धार्मिक अनुभवांवरून लेखन करताना वाचकांपर्यंत सत्य धार्मिक लेख,कथा ज्योतिष उपाय त्यांच्या लेखनातून पोहचवतात.

प्रियांका लोंढे यांनी मास्टर इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन टीममध्ये कार्यरत असून ज्योतिष,टॅरोट कार्ड्स,अंकशास्त्र,धार्मिक कथा कहाण्या यामध्ये त्यांना आवड असल्याने त्यांनी यासर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे. आपल्या लेखातून त्या नेहमी ज्योतिषीय बातम्या लिहिताना तथ्य पडताळून योग्य संदर्भ देऊन वाचकांपर्यंत सत्य माहिती पोहचवतात. या बाबतीत त्यांना स्वतःचे अनुभव कामी येतात. प्रियांका स्वतः धार्मिक असल्याने त्या अनेक तीर्थस्थळी यात्रा करतात. आपल्या यात्रेतील अनुभव पाठीशी घेऊन तसेच दैनंदिन पूजापाठ कशाप्रकारे करावी संकल्प कसा घ्यावा मनोकामना प्राप्तीसाठी काय करावे हे सर्व त्या स्वतः अनुभव घेऊन आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत पोहचवतात त्यामुळे त्यांचे लेख वाचकांच्या जास्त जवळ जाऊ शकतात व वाचकांना योग्य ती माहिती मिळते.

धार्मिक लेखनासोबतच प्रियांका लोंढे यांनी महिलांसाठी लेखन केले आहे. त्यांनी लोकमत या वृत्तपत्रात असताना नाईट शिफ्ट करणाऱ्या महिला रात्री प्रवास करताना सुरक्षित असतात का या बाबतीत लोकमत टीमसोबत स्टिंग ऑपरेशन केले होते. ही बातमी वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचली व त्यांच्या टीमचे कौतुक झाले. या स्टिंग ऑपरेशनसाठी त्यांना “रणरागिणी” हा पुरस्कार मिळाला होता. सामाजिक संस्थांसोबत जोडून त्यांनी अनाथ मुले,महिला यांच्या समस्या आपल्या लेखनातून समाजासमोर मांडल्या. सध्या त्या धार्मिक लेखन करत असून आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहचवता यावी यावर विशेष लक्ष देतात. प्रियांका आपल्या लेखात काही ज्योतिष उपाय सांगतात जे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून असतात शिवाय लाल किताब किंवा ज्योतिष एक्सपर्ट यांनी दिलेल्या माहितीवर आधारित लेख त्या लिहितात.

शिक्षण व कार्य अनुभव
– प्रियांकाने 4 वर्ष लोकमत वृत्तपत्रात विविध विषयांवर पत्रकार म्हणून लेखन केले. त्यांनी अनेक स्टोरीज या एक्लुझिव्ह लिहिल्या आहेत. लोकमतसाठी मनोरंजन विभागात काम करताना बऱ्याच सेलिब्रिटीजचे इंटरव्यू घेतले. तसेच अनेक चित्रपटांचे रिव्ह्यू देखील केले आहेत. क्राईम बीटसाठी काम करताना स्टिंग ऑपरेशन केले आहेत.
– ईटीव्ही मराठीमध्ये एंटरटेनमेंट डेस्कसाठी कंटेन्ट एडिटर म्हणून काम केले आहे.
– महाराष्ट्र मीडिया पीआर कंपनीमध्ये VSTF या महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी काम केले. तसेच अनेक नामांकित ब्रँडसाठी कंटेन्ट रायटिंग केले आहे.
– ब्लूपॅड या अँपमध्ये अनेक विषयांवर 1000 हुन अधिक लेख लिहिले आहेत.
– एस्ट्रोटॉक या अँपमध्ये देखील कंटेन्ट रायटर या पदावर काम केले आहे. ज्योतिषीय विषयांवर अभ्यास व रिसर्च करून लेखन केले आहे.
– प्रियांका सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉमच्या एस्ट्रो रिलिजन सेक्शनसाठी कार्यरत आहे. येथे त्या ज्योतिष व धार्मिक विषयांवर स्वतःचे अनुभव, अभ्यास व रिसर्च करून लेख लिहितात.आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *