श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडियाला आयर्लंड दौऱ्यातील पहिल्याच टी 20i मॅचमध्ये उलटफेरचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडने वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर 34 धावांनी मात करत 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. आयर्लंडने टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आयर्लंडने टीम इंडियाला 7 बॉलआधी ऑलआऊट केलं. आयर्लंडने टीम इंडियाला 18.5 ओव्हरमध्ये 148 रन्सवर गुंडाळलं. आयर्लंडने अशाप्रकारे टीम इंडिया विरुद्ध टी 20i क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवला.