Inflation Increase: सर्वसामान्यांचे हाल होणार; महागाईत आणखी वाढणार; एक गोष्ट ठरतेय ‘व्हिलन’ – Marathi News | Deficient monsoon could push headline inflation above 5% in FY27


आतापर्यंत, मध्य पूर्वेतील युद्धामुळे अर्थशास्त्रज्ञ सातत्याने इशारा देत होते की या संघर्षामुळे महागाईचा मोठा धोका आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक तेल आणि वायू संकट अधिकच वाढले, ज्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीही वाढल्या. वाहतूक खर्च वाढल्याने महागाईत मोठी वाढ झाली. हे सर्व कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे घडले. आता अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबले असल्याने आता महागाई वाढण्यामागे कच्चे तेल जबाबदार राहिलेले नाही. अमेरिका-इराण शांतता कराराच्या घोषणेपासून कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. यामुळे महागाईचा धोकाही कमी झाला आहे, कारण होर्मुझ सामुद्रधुनी उघडल्याने तेल पुरवठा साखळीतील अडथळे दूर होत आहेत पण तरीही सर्वसामन्यांचे बजेट बिघडणार आहे असे चित्र पाहायला मिळाले.

कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीच्या परिणामामुळे, भारतातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमधील 3.48% वरून मे महिन्यात 3.93% पर्यंत वाढला. अन्नधान्याच्या किमतीतील वाढ आणि इंधनाच्या दरवाढीने यात महत्त्वाची भूमिका बजावली. मे महिन्यात घाऊक महागाईचा दरही 9.68% वर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2027 साठीचा आपला महागाईचा अंदाज 4.6% वरून 5.1% पर्यंत वाढवला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल 100-110 डॉलरच्या वर गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत, अमेरिका-इराण शांतता कराराच्या घोषणेनंतर मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल 77 डॉलरपर्यंत खाली आल्या. दर इतके कमा होऊनही महागाई काही थांबेना. पण आता तज्ज्ञांचे मत आहे की खलनायक कच्चे तेल नसून इतर कारण आहे, ज्याचा धोका आता गंभीर आहे. इन्फोमेरिक्स रेटिंग्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी सांगितले की, “आज भारतातील महागाईसाठी सर्वात मोठा धोका तेल नसून मान्सून आहे.”

शर्मा यांनी सांगितले की, “कच्च्या तेलापेक्षाही कमी पावसामुळे भारतासाठी महागाईचा धोका अधिक आहे. याचे सोपे कारण म्हणजे, भारतातील महागाईच्या गणनेत इंधनाच्या किमतींपेक्षा अन्नधान्याची भूमिका अधिक मोठी असते. भारतातील जवळपास निम्मी शेती पावसावर अवलंबून आहे; पावसाच्या कमतरतेमुळे धान्य, कडधान्ये, भाजीपाला, फळे आणि तेलबियांच्या उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते, ज्यामुळे महागाईत मोठी वाढ होऊन घरगुती बजेट विस्कळीत होऊ शकते.”

शर्मा म्हणाले की, कमी पावसामुळे, विशेषतः एल निनोच्या काळात, अन्नधान्याच्या वाढलेल्या किमतींमुळे घरगुती खर्चात लक्षणीय वाढ होते. कमी पावसामुळे अनेकदा भाजीपाला, कडधान्ये, खाद्यतेल आणि दुधाच्या किमती दुहेरी अंकात जातात. मध्यमवर्गीय शहरी कुटुंबासाठी, यामुळे मासिक खर्चात 1,000 ते 3,000 रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *