Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस


Devendra Fadnavis on Maharashtra Rain: मुंबईत एका महिन्यात होणारा पाऊस गेल्या चार दिवसांमध्येच पडला आहे. त्यामुळे मुंबईत इतकी हानी झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. राज्यात अतिवृष्टीच्या अनुषंगाने 8 जुलैपर्यंत चिंता करण्याची परिस्थिती आहे, असेही त्यांनी म्हटले.  राज्यातील अतिवृष्टीच्या (Rain) पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयातील आपत्ती निवारण व्यवस्थापन कक्षात जाऊन मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईबाबत बोलताना सांगितले की, मुंबईत सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून समुद्राला भरती येणार आहे. या काळात मुसळधार पाऊस झाल्यास काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच या काळात 60 ते 70 किमीच्या वेगाने वारे वाहतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Maharashtra Rain news)

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी येथे अख्खा डोंगर कोसळून खाली आला. तो ढिगारा काढण्याचे काम सुरु आहे. अभूतपूर्व पावसामुळे या मार्गावर आठ ठिकाणी दरड कोसळली आहे. हा सगळा ढिगारा बाजूला करुन मुंबई गोवा महामार्ग पुन्हा सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळली. त्यामुळे 100 टन ढिगारा रस्त्यावर आला. ही दरड अशा भागात कोसळली की, जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नव्हती. आतापर्यंत जवळपास 70 टन ढिगारा हटवण्यात आला आहे. उर्वरित ढिगारा हटवून मुंबई-पुणे महामार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईवरुन पुण्याकडे जायच्या मार्गावरील तीन लेन सुरु आहेत. तर मुंबईकडे येणारी एकच लेन सध्या सुरु आहे. पुढील  काही तासांत वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय, साताऱ्यातही अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरु आहे. आठ तारखेपर्यंत लक्ष देण्यासारखी परिस्थिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *