AC किती तासांनी बंद करावा? 90 टक्के लोकांना माहिती नाही


उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घराघरात AC चा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेकदा लोक थंड हवेसाठी AC दिवस-रात्र सुरू ठेवतात. परंतु, AC सतत सुरू ठेवल्याने मशीनवर ताण पडतो आणि बिघाड होऊ शकतो. म्हणूनच AC नक्की किती वेळ चालवावा आणि त्याला कधी विश्रांती द्यावी, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

AC। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
AC दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि विजेचे बिल मर्यादित ठेवण्यासाठी त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. सलग अनेक तास AC चालवल्याने कॉम्प्रेसर गरम होतो आणि अपघात होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेसाठी ठरावीक तासांनंतर AC बंद करून त्याला आराम देणे का आवश्यक आहे, याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत.

उन्हाळ्याच्या हंगामात लोक AC सतत चालू ठेवतात जेणेकरून खोली थंड राहील आणि गरम वाटू नये. परंतु अशा काही चुका आहेत ज्या आपण जाणूनबुजून किंवा नकळत करतो, ज्यामुळे AC मध्ये आग देखील येऊ शकते. काही लोक थोडा वेळ घराबाहेर जात असले तरी ते एअर कंडिशनर बंद करत नाहीत की परत आल्यास खोली थंड होईल. ही चूक खूप जड असू शकते, म्हणून सतत एसी चालवल्यानंतर किती तास AC विश्रांती घ्यावी (बंद करावी) हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

जर AC कोणत्याही कारणाशिवाय तासंतास चालू राहिला तर तो आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. तुम्ही ऐकले असेल की उपकरण कोणतेही असो, दीर्घ काळासाठी वापरले तर ते जास्त गरम होऊ लागते, काहीसे असेच एअर इंडिश्नरचं आहे.

फक्त इतका वेळ AC चालवायचा

क्रोमाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एअर कंडिशनर चालवल्यानंतर तो कधी बंद केला पाहिजे, हे खोलीच्या आकारावर आणि आपला AC किती टन आहे यावर अवलंबून असते. समजा तुमची खोली लहान आहे आणि तुम्ही 1 टन AC बसवला आहे, तर AC 8 ते 10 तास सतत चालू ठेवता येईल. दुसरीकडे, जर खोली मोठी असेल आणि तुम्ही 1.5 किंवा 2 टन AC लावले असेल तर तुम्ही 12 तास आरामात AC चा वापर करू शकता. पण यानंतर तुम्हाला AC ला विश्रांती (बंद) द्यावी लागेल.
जर AC आणखी जास्त काळ सतत चालू राहिला तर AC ओव्हरहीटिंग सुरू होईल, म्हणून योग्य वेळी AC बंद करणे आवश्यक आहे जेणेकरून AC ला थंड होण्यास वेळ मिळेल आणि ओव्हरहीटिंगची समस्या उद्भवणार नाही. जर ओव्हरहीटिंगची समस्या असेल तर कॉम्प्रेसर फुटू शकतो, आग लागू शकते आणि आपल्याला दुखापत देखील होऊ शकते. कोणतीही मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी आधीच काळजी घेतलेली कधीही योग्य.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा