सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. जीममधून येताना, एअरपोर्टवर, लेट – नाईट पार्टीतून बाहेर पडणाऱ्या सेलिब्रिटींना पापाराझी फॉलो करत असतात. ज्यामुळे पापाराझींना प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. पापाराझी सेलिब्रिटींचे ‘बॅक पोज’ आणि Oops Moment बळजबरी कॅमेऱ्यात कैद करतात, पापाराझी सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीमध्ये दखल देतात…असं सर्वांना वाटतं, पण असं काहीही नसतं. यावर आता प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफरने थक्क करणारा खुलासा केला आहे.. ज्यामुळे बॉलिवूडच्या या ‘स्पॉटिंग गेम’चं पूर्ण सत्य समोर आलं आहे.
शैलेश पांडे यांनी स्पष्ट केलं की, यात पापाराझींची काहीही चूक नसते; उलट, खुद्द सेलिब्रिटीच या गोष्टींचे नियोजन करत असतात. शैलेश यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आम्ही काही देव नाही आहोत, कोणता सेलिब्रिटी कोणत्या विमानतळावरून किंवा रेस्टॉरंटमधून आणि किती वाजता बाहेर पडणार आहे, याचा आम्हाला काही जादूने किंवा स्वप्नातून पत्ता लागत नाही. एखादा सेलिब्रिटी नेमका कुठे आणि कधी येणार आहे, याची माहिती देणारे विशिष्ट मेसेजआम्हाला त्यांच्या पीआर टीमकडून मिळतात आणि त्यानुसारच आम्ही तिथे जाऊन त्यांचे फोटो काढतो.”
आलिया भट्टचं उदाहरण देत सांगितलं मोठं सत्य
शैलेश पांडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जर एखाद्या सेलिब्रिटीने सांगितलं आम्हाला पापाराझी कल्चर आवडत नाही, तर ते हे सगळं थांबवू देखील शकतात… यावर शैलेश यांनी बॉलिवूड अभिनेत्रीचं देखील उदाहरण दिलं. शैलेश यांनी सांगितलं की, ‘आलिया भट्ट हिने स्पष्ट सांगितलं आहे की, तिला प्रत्येक ठिकाणी कॅप्चर करायचं नाही आणि पापाराझी देखील त्याच्या शब्दांचा आदर करतात…’
शैलेश पुढे म्हणाले, ‘जर कोणत्या सेलिब्रिटीला पापाराझी कल्चर आवडत नसेल तर, त्यांनी एक अधिकृत ट्विट करायला हवं… त्यानंतर कोणी पागल नाही, बळजबरी तुमचे फोटो क्लिक करेल…. सेलिब्रिटी स्वतः आम्हाला लोकेशन पाठवतात. कमीत कमी त्यांनी हे सत्य स्वीकारलं पाहिजे…’, असं देखील शैलेश पांडे म्हणाले.
पॉडकास्टदरम्यान, पापाराझींवर वारंवार संताप व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जया बच्चन यांच्याबद्दलही चर्चा झाली. त्यांनी अनेक प्रसंगी पापाराझींवर ओरडून उघडपणे राग व्यक्त केला आहे. यावर मत मांडताना शैलेश म्हणाले, जया बच्चन यांची चूक म्हणजे त्यांनी चेहऱ्यावर हास्य ठेवून केलेलं ते विधान होतं, “किमान मी तरी शॉर्ट्स घालून कामावर जात नाही.”, असं देखील शैलेश म्हणाले.