शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज शिर्डी दाैऱ्यावर आहेत. त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचाैरे यांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे पोहोचले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचाैरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना झाली. कुणाच्या तरी गाडीची चावी हरवली, सापडली तर आणून द्या. मी तुम्हाला एक सूचना करणार आहे. की आपला खासदार पळाला आहे. सापडला तर सोडू नका. अजिबात त्याला परत आणू नका. आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर असं जग झालं. काहींच्या रक्तात आणि नसानसात गद्दारी भरलेली असते. त्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वाकचौरे. हा खाऊसाहेब आहे. जाऊ तिथे खाऊ. पण मी आता तुमच्यासमोर येण्या आधी मला काहीजण भेटत आहेत.
मला म्हणाले, साहेब हा शुभ शकून आहे. ते म्हणाले, या गद्दाराला 2009 मध्ये निवडून दिलं. 2014 ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे. त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिर्डी आहे. पवित्र शिर्डी आहे. श्रद्धा आणि सबुरीला महत्त्व आहे. कुठे तरी श्रद्धा असावी लागते. आपली साईबाबावर, कामावर आणि भगव्यावर आहे. यांची कशावर श्रद्धा नाही. सबुरीचा तर पत्ताच नाही. रोज नवीन बाप. जरा थांबला असता तर केंद्रात सरकार आलं होतं.
पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आता थांबला असता तर उद्या येणारं सरकार आपलं आहे. काही काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. उद्या सरकार आल्यावर हे भ्रष्ट विचाराचे लोकं नसावेत म्हणून त्यांना ही दुर्बधी किंवा सुबुद्धी देवाने दिली असेल, उद्धव ठाकरे यावेळी महिला आरक्षणाबद्दलही बोलताना दिसले. 100 दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखा जगावा.