आता यावर स्वानंदीचं काय उत्तर असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. समर स्वानंदी त्या माळरानावर एकत्र वृक्षारोपण करणार आहेत. स्वानंदीने अजूनही त्याच्या प्रेमाला उत्तर दिलेलं नसल्यामुळे समर म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नाही, तर वटपौर्णिमेची पूजा करू नका.” आता वटपौर्णिमेच्या दिवशी समर येईल का, याची स्वानंदीला चिंता आहे. मात्र इथे स्वानंदीला एक सुखद धक्का बसणार आहे. तिथे आधीच आलेला समर इतर महिलांसोबत वडाच्या झाडाची पूजा करतोय, हे पाहून स्वानंदीच्या आनंदाला पारावार राहत नाही.