IND VS AFG 2nd ODI : ज्यावेळी वाटत होतं आज रोहित इतिहास रचणार, त्याच क्षणी घात झाला! राशिदच्या त्या गुगलीने हिटमॅनला कसं फसवंलं? पाहा Video


Rohit Sharma Bowled By Rashid Khan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (IND VS AFG 2nd ODI) मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, एका मोठ्या खेळीपासून तो मुकला. जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या रोहितला अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खानने आपल्या एका जादूई चेंडूवर क्लीन बोल्ड करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या विकेटसह राशिद खानने पुन्हा एकदा सिद्ध केले की, रोहितविरुद्ध त्याचे पारडे नेहमीच जड राहिले आहे.

रोहित शर्मा झाला बोल्ड, नेमकं काय घडलं?

हा थरार भारतीय डावाच्या 13.1 षटकात पाहायला मिळाला, जेव्हा राशिद खान गोलंदाजीसाठी आला. राशिदने 92.7 किलोमीटर प्रति तास वेगाची एक अचूक गुगली टाकली, जी समजून घेण्यात रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला. चेंडू पिचवर टप्पा पडल्यानंतर वेगाने आतल्या बाजूला वळाला. बॅकफूटवर असलेल्या रोहितला सावरण्याची संधीच मिळाली नाही. त्याने घाईघाईत आपली बॅट खाली आणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत चेंडू बॅटची आतली कडा घेत थेट स्टंप्सवर जाऊन धडकला.

बाद होण्यापूर्वी रोहित शर्माने मैदानाच्या चारी बाजूंना काही चांगले फटके मारले होते. मात्र, अवघ्या 2 धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. रोहितने 39 चेंडूंचा सामना करताना 48 धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. रोहित जोपर्यंत क्रीझवर होता, तोपर्यंत तो आज मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते, पण राशिद खानने योग्य वेळी विकेट घेत भारताला मोठा धक्का दिला.

रोहित विरुद्ध राशिद, आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीवर नजर टाकली तर रोहित शर्माविरुद्ध राशिद खानचा दबदबा नेहमीच राहिला आहे. आतापर्यंत हे दोघे 11 डावांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत, ज्यात रोहितने रशीदच्या 75 चेंडूंवर102 धावा केल्या आहेत, परंतु याच काळात रशीदने त्याला सहा वेळा बाद केले आहे. रशीदविरुद्ध रोहितची फलंदाजीची सरासरी केवळ 17 आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, राशिद खानच्या फिरकीसमोर रोहित शर्मा अनेकदा अडचणीत सापडला आहे आणि या सामन्यातही राशिदने तीच परंपरा कायम ठेवली.

हे ही वाचा – 

Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : पहिले थर्ड अंपायर धावला, मग फिल्डरने जीवदान दिलं; पण वैभव सूर्यवंशीने शेवटी माती खाल्ली?, नेमकं काय घडलं?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *