भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणांच्या वेळी सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याचे भाव पाहून सर्वसमान्यांना ते खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत असल्याचे चित्र आहे.