Vinayak Raut: विनायक राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार? राऊत यांनी दिले संकेत; काय घडणार? – Marathi News | Shiv Sena UBT leader Vinayak Raut hinted at a possible meeting with Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सतत काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणी पक्षांतर करत आहे, कोणाची खासगी प्रकरणे समोर येत आहेत. सतत काही ना काही घडताना दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते विनायक राऊत यांचे कुटुंबिय देखील चर्चेत आहेत. राऊतांची सून गिरिजा यांनी पती गितेश राऊतवर खळबळजनक आरोप केले. याविषयी प्रश्न विचारताच विनायक राऊत यांनी थेट या विषयात बोलण्यासारखे काहीही नाही असे म्हटले आहे.

“या विषयात बोलण्यासारखे काहीही नाही”

विनायक राऊत यांनी मुलगा गितेशच्या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता वर्तवली आहे. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत संकेत दिले. राऊत म्हणाले, “या विषयात बोलण्यासारखे काहीही नाही. अँटीसेप्टरिबेल प्रकरण अद्यापही कोर्टात पेंडिंग आहे. त्याची सुनावणी २३ तारखेला आहे आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर आणि न्यायालयावर.”

वाचा: तो माझ्या मासिक पाळीच्या वेळी मोबाईलमध्ये… विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप

ते पुढे म्हणाले, “जाणीवपूर्वक पॉलिटिकली ड्रामेबाजी केली जात असेल तर ठीक आहे. सध्या याच्यावर मला काही बोलायचे नाही. मी २३ तारखेनंतर बोलणार आहे. आज मी तुम्हाला काही सांगत नाही, २३ तारखेनंतरच सांगेल.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे संकेत

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीची शक्यता स्पष्ट केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री आमचेही आहेत. मी सुद्धा त्यांना भेटू शकतो.” राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. २३ तारखेनंतर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरण न्यायालयीन पातळीवर असल्याने राऊत यांनी सावध भूमिका घेतली असल्याचे दिसते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी दाखवून त्यांनी राजकीय संवादाची दारं खुली ठेवली आहेत. या विकासामुळे आगामी काळात शिवसेना (यूबीटी) आणि महायुती सरकार यांच्यातील संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. २३ तारखेची सुनावणी आणि त्यानंतर राऊत यांचे विधान यामुळे पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *