Devendra Fadanvis manoj jarange patil: मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे मनोज जरांगे पाटील आता फडणवीसांबरोबर एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान उपोषण करताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा अनेकांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना जरांगे पाटलांनी अनेकदा जहरी शब्दांचाही वापर केला. याशिवाय त्यांची जीभही घसरली, त्यांनी फडणवीसांच्या आईवरूनही अपशब्द वापरले. दरम्यान, आता मात्र हे दोघे एका कार्यक्रमात एकमेकांबरोबर एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.
पंढरपूर- मंगळवेढाचे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी या सोहळ्याचे नियोजन केले आहे. ते म्हणालेत की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचेही मान्य केले आहे.” दरम्यान, या कार्यक्रमाला इतरही अनेक सर्वपक्षीय नेते, मंत्री खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबईतील आझाद मैदानातील जरांगेंचं आंदोलन त्यानंतर मिळालेलं मराठा आरक्षण या घडामोडीनंतर फडणवीस व जरांगे पाटील एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे राजकीय महत्व वाढत आहे. पुतळा समितीच्या सदस्यांनीही जरांगे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबईतील जरांगेंच्या उपोषणावेळी मुख्यमंत्री आझाद मैदानावर गेले नव्हते. ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घेण सरकारला परवडणारे नव्हते त्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र, आता हे दोन नेते एका मंचावर येत असल्याने जोरदार चर्चांना पेव फुटले आहे.
निवडणुकांपूर्वी धनंजय मुंडे परळीत ॲक्टिव्ह; दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे व महाराष्ट्राचे दैवत असल्याने या कार्यक्रमाला अनेक नेते उपस्थित राहतील, यात शंका नाही. त्यामुळे फडणवीस- जरांगेही या एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत का नाही हे आपल्याला २६ तारखेला कळणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा