
आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी राज्यभरातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी (Varkari) चालत पंढरीच्या दिशेने जात असतात.

या आषाढी वारीला (Ashadhi Vari) गालबोट लावणारी एक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. जेजुरीत वारकऱ्यांच्या भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 15 ते 16 वारकरी जखमी असल्याची माहिती आहे. ज्या ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी परिसरातील भोंगळे मळा वारकऱ्यांच्या अपघात झाला. यावेळी एका ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिल्याचे समजते. यामध्ये 15 ते 16 वारकरी जखमी झाले होते.

हे वारकरी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जात असताना हा प्रकार घडला. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला असून आणखी काही वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

ज्ञानोबा माऊलींची पालखी काल जेजुरी मुक्कामी होती. सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज पालखी जेजुरीत येणार आहे. आज सकाळी वारकऱ्यांनी जेजुरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती.

या रस्त्याला एका बाजूने वाहने सोडली जात आहेत. यापैकी एका ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची माहिती आहे.

या वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून तिघांची प्रकृती गंभीर होती. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. (Ashadhi Vari news)

आज सकाळी ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीला जाणार आहे. या पालखीच्या आधी काही वारकरी पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघतात.

आज सकाळी हे वारकरी रस्त्यावरुन चालत असताना सामान वाहून नेणार एक ट्रक वारकऱ्यांच्या गर्दी शिरला. या ट्रकने पाठून सहा वारकऱ्यांना जोरदार धडक दिली.

हे सर्व वारकरी आनंदाच विठुनामाचा गजर करत चालत होते. मात्र, या अपघातानंतर घटनास्थळी किंकाळ्या आणि रडण्याचे सूर ऐकायला येत होते.

जेजुरी येथील अपघातात मयत झालेल्यांची नावे, राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार.

हा ट्रक नांदेडमधील आहे. वारीसाठीच शिधा मटेरिअल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रॅक्टर चालवणाऱ्याला तापाच्या गोळ्या घेतल्याने ग्लानी आली आणि त्यानंतर त्याचा ताबा सुटला. तीन मृत महिला या सांगलीच्या आहेत.

जेजुरीजवळच्या सासवडे गावात हा अपघात घडल्याची माहिती जेजुरीचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एक ट्रक अचानक दिंडीत घुसला.

या दुर्घटनेत 15 ते 16 वारकरी जखमी झाले आहेत. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत महिला सांगलीच्या दिग्रस परिसरातील असल्याचे मंगेश घोणे यांनी सांगितले.

या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
Published at : 13 Jul 2026 01:23 PM (IST)