इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी ड्रामा, टीम इंडिया नाणेफेकीसाठी मैदानात पोहोचली नाही, कारण… – Marathi News | Team India arrived late at the stadium for the fifth T20 match after getting stuck in traffic delay for toss


भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारताने ही मालिका आधाची 3-0 ने गमावली आहे. त्यात एकही विजय न मिळाल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताने या सामन्यात चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये काही बदल असतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेकीचा कौल संध्याकाळी 6.30 वाजता होणार होता. मात्र टीम इंडिया मैदानात पोहोचली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं? याबाबत उत्सुकता वाढली. पण टीम इंडिया ट्राफिकमध्ये अडकल्याने वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल होण्यास उशीर झाला.

भारतीय संघ मैदानात संध्याकाळी 6.35 वाजता पोहोचला. त्यामुळे नाणेफेकीला वेळ होणार हे नक्की झालं. पण नेमकं काय झालं? याबाबत सविस्तर काही कळू शकलेलं नाही. पण नाणेफेकीचा कौल उशिरा झाल्याने सामना सुरू होण्यास उशीर होणार हे नक्की झालं. पण नाणेफेकीचा कौल किती वाजता होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सामना सुरू होण्यास वेळ होणार असल्याने इंग्लंडने ही वेळ साधली. त्यांनी मैदानात आपला सराव सुरू ठेवला. इंग्लंडने मालिका आधीच 3-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना औपचारिक आहे. त्यात संघावर दडपण नसल्याने इंग्लंडचा संघ टीम इंडियावर भारी पडणार असंच दिसत आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचं आव्हान असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *