राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातूनच मोठे आव्हान मिळाले. थेट नोटीसच पाठवण्यात आली. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस पाठवली आहे. सुनेत्रा पवार यांची झालेली अध्यक्षपदाची निवड ही घटनेला धरून नसल्याचे त्या पत्रात म्हटले, ज्याने मोठी खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. थेट वकिलांकडून ही नोटीस पाठवण्यात आली. यासोबतच अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, असेही त्यात म्हणण्यात आले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सर्व धूरा आपल्या हातात घेतली. मात्र, आता त्यांना पक्षातूनच आव्हान मिळताना दिसतंय. यावर सुनेत्रा पवार नक्की काय भूमिका घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
यादरम्यानच आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवार यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा आणि माझा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांची निवड घटनेला धरूनच झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे गरजेचे असल्याचे माझे मत होते.
माझ्या मताचा आणि या नोटीसचा काहीच संबंध नाही. ते माझे वैयक्तीक मत आहे. पक्षांतर्गत काही सुधारणा करणे गरजेचे असल्याचेही प्रफुल पटेल यांनी म्हटले. प्रफुल पटेल यांनी पक्षांतर्गत काही सुधारणा झाल्या पाहिजे, असे म्हटले होते. मात्र, या नोटीसचा आणि आपला काहीच संबंध नसल्याचेही त्यांनी यादरम्यान स्पष्ट केले.
अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर पवार कुटुंबातील वादही पुढे आले. शरद पवार यांना अजित पवार यांच्या निधनानंतर कोणतीही कल्पना न देताच सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईला आल्या आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले की, आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नाही.