टी20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरवर चोहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही मालिका गमवण्याची भीती आहे. असं असताना त्याच्या बहिणीने त्याची पाठराखण केली आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, विराट-रोहित चांगले कर्णधार होते. पण त्यांनीही सामने गमावले आहेत. त्यामुळे कोणाच्या नेतृत्वात सर्वाधिक सामने गमवले गेले याची चर्चा सुरू झाली आहे. (फोटो-PTI)