विशेष म्हणजे, हे अजरामर गाणं गाण्यासाठी गझलसम्राट पंकज उधास सुरुवातीला तयार नव्हते. या गाण्यातील विरह आणि भावनांना आपण न्याय देऊ शकू का, अशी शंका त्यांना होती. मात्र दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांना समजावले की, परदेशात आपल्या कार्यक्रमाला आलेल्या भारतीयांसमोर हे गाणं गात असल्याची भावना मनात ठेवून गायचे.