इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली. खरं तर वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सलग दोन पराभव झाले आणि मालिका हातून गेली. असं असताना कर्णधार शुबमन गिलने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला. गिलच्या मते, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस योग्य नाही, त्यामुळे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी घातक ठरू शकते. (Photo: PTI)