बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. या झगमगत्या विश्वात कोणाचं नाव कधी कोणासोबत जोडलं जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. बॉलिवूडमध्ये प्रेम, लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप… चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रिटी देखील यावर स्पष्ट बोलतात. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता देखील चाहत्यांना असते. पण बॉलिवूडमध्ये असा एक अभिता होऊन जो, रिलेशनशिपमुळे नाही तर अनेक महिलांसोबत असलेल्या वन नाईट स्टँडमुळे चर्चेत आलेला…
सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ते अभिनेते दुसरे तिसरी कोणी नसून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आहे. ऋषी कपूर यांचे अन्य महिलांसोबत असलेल्या वन नाईट स्टँडबद्दल खुद्द अभिनेत्री नीतू कपूर यांनी खुलासा केलेला. मुलाखतीत नीतू कपूर असं देखील म्हणालेल्या की, ‘ऋषी कपूर यांचे अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध चालतील, पण कोणत्या महिलेसोबत नातं पुढे नेलं असतं तर, त्यांना घरात घेतलं नसते…’
एका जुन्या मुलाखतीत नीतू कपूर म्हणालेल्या, ‘मी स्वतः माझ्या नवऱ्याला 100 महिलांसोबत फ्लर्ट करताना पाहिलं आहे. पण प्रत्येक महिलेसोबत फक्त वन नाईट स्टँड असल्याचं त्यांनी कबूल केलं होतं.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीतू कपूर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ‘ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मला प्रचंड त्रास व्हायचा. आमची अनेकदा भांडणं देखील झाली. माझे मित्र इंटस्ट्रीमधील असल्यामुळे मला सतत फोन देखील यायचा. आउटडोर शूटिंग असायची तेव्हा ऋषी कपूर यांच्याबद्दल मला अनेक गोष्टी कळल्या होत्या..’
‘कालांतराने मी देखील ऋषी यांना बोलणं सोडलं होतं. कारण मला कळून चुकलं होतं, की इतर महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये नसून फक्त वन नाईट स्टँड्स शारीरिक संबंध होते. ऋषी कपूर माझ्याशिवाय राहू शकत नव्हते. काहीही झालं तरी, त्यांनी कुटुंबाची निवड केली असती.. ही एक महत्त्वाची गोष्ट देखील माझ्या लक्षात आली होती… जर कोणत्या महिलेसोबत ऋषी कपूर यांचं नातं पुढे गेलं असतं, तर त्यांना घरातून बाहेर काढलं असतं.’
पुरुषांच्या स्वभावावर नीतू कपूर म्हणाल्या, ‘पुरुषांच्या स्वभावातच फ्लर्ट करणं असतं. म्हणून त्यांनी थोडी-फार सूट दिली पाहिजे..’, इंडस्ट्रीमध्ये अनेकांचे विवाह्यबाह्य संबंध असल्याचं समोर आलं. यामुळे काही सेलिब्रिटींचे घटस्फोट देखील झाले, तर काहींनी कुटुंबाला अधिक प्राधान्य दिलं.