‘तुमच्या मनगटात…, ‘जैन मुनींनी राज ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, वातावरण तापणार – Marathi News | Jain Muni Nileshchandra’s response to Raj Thackeray’s criticism regarding the ‘white strip’


मुंबईच्या दादर येथील एका सोसायटीत जैन धर्मगुरुंसाठी रस्त्यावर रंगवलेल्या पांढऱ्या पट्टीवरून मराठी आणि जैन असा वाद रंगला आहे. या प्रकरणात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्दा लावून धरला आहे.पांढरी पट्टीवरुन जैन मुनी निलेशचंद्र यांनी मराठी लोकांवर टीका केली होती. त्याला आत मनेसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले होते. त्यावरुन आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी पुन्हा राज ठाकरे यांच्यावर टीका करुन त्यांना आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.

दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या वादावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात आता थेट वाकयुद्ध पेटले आहे. राज ठाकरे यांनी पांढऱ्या पट्टीचे अलिकडे आलेले फॅड पाहून त्यावर टीका केली होती. या तुमचे मुनीकडे सर्वत्र जातात, हायवे वरुन जातात. मगे तेथेही मारणार का पांढऱ्या पट्ट्या. जैन समाज असा नाही अलिकडील काही लोक भाजपाच्या नादी लागून असे वाद उकरुन काढत आहेत. कधी कबुतर तर कधी असे पांढरी पट्टीचे वाद काढून तुमच्या भांडणं लावून निवडणूक प्रक्रियेकडे तुमचे दुर्लक्ष व्हावे म्हणून वाद केले जात आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. कोण तरी तो मुनी कुरळी दाढीवाला फिरत असतो असे म्हणून राज ठाकरे यांनी जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावरही टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी, “हा वाद केवळ व्होट बँकेसाठी असून तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्र ओळखतो,” अशा शब्दांत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. स्वतःला कट्टर सनातनी असल्याचे सांगत जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले की “मंत्रालयात बसणारा राम आहे आणि त्याचा हनुमान ( नितेश राणे ) महाराष्ट्रात आहे. जे लोक भगव्याला हिरवं करण्याचा विचार ठेवतात, त्यांना सरळ करायला हनुमान समर्थ आहे,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच, माझ्या समाजाला जिथे गरज पडेल, तिथे मी लढायला तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माझे केस वाकडे की तिकडे…

“माझे केस वाकडे की तिकडे, हा माझा प्रश्न असून मी कुणाला उत्तर देण्यास बांधील नाही,” असे म्हणत त्यांनी वैयक्तिक टीकेला उत्तर देणे टाळले. जे मोदी आणि योगींचे विरोधक आहेत, तेच माझे विरोधक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादरमधील कबुतरांचा वाद राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उकरून काढल्याचे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *